शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Cyclone Amphan : ‘अ‍ॅम्फन’च्या तडाख्याने पश्चिम बंगालमध्ये ७२ ठार, ओडिशातही धूळधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 05:59 IST

हजारो लोक बेघर झाले असून पश्चिम बंगालच्या दीघा किनारपट्टीला धडकलेल्या या विक्राळ चक्रीवादळाने पश्चिम बंगालसोबत ओडिशातही भयंकर हैदोस घातला.

कोलकाता/भुवनेश्वर : ताशी १९५ किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासोबत धडकलेल्या ‘अ‍ॅम्फन’ चक्रीवादळाने पश्चिम बंगालमध्ये ७२ लोकांचा बळी घेत भयानक धूळधाण केली. हजारो लोक बेघर झाले असून पश्चिम बंगालच्या दीघा किनारपट्टीला धडकलेल्या या विक्राळ चक्रीवादळाने पश्चिम बंगालसोबत ओडिशातही भयंकर हैदोस घातला. वेगवान वाºयासोबत आलेल्या जोरदार पावसाने सखल भाग जलमय झाले असून मातीची घरे आणि उभी पिके उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक ठिकाणी उभी झाडे आणि विजेचे खांब उखडून पडले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी या हानीची हवाई पाहणी करणार आहेत.पश्चिम बंगालमधील उत्तर आणि दक्षिण २४ परगणा हे दोन जिल्हे अ‍ॅम्फन चक्रीवादळाच्या तडाख्याने पूर्णत: उद्ध्वस्त झाले आहेत. ओडिशातील किनारपट्टीवरील अनेक भागांत वीज आणि दूरध्वनी सेवा ठप्प झाली असून ओडिशातील जवळपास ४४ लाखांहून अधिक लोकांना तडाखा बसला आहे. प. बंगाल आणि ओडिशात धूळधाण करणाºया या चक्रीवादळाने बांगलादेशातही १० लोक ठार झाले असून बांगलादेशातील किनारपट्टीवरील अनेक गावे उद्ध्वस्त झाली आहेत.उत्तर आणि दक्षिण २४ परगणा तसेच कोलकाता बुधवारी सायंकाळपासून अंधारात आहे. दूरध्वनी आणि मोबाईल सेवाही ठप्प आहे. यावेळी चक्रीवादळाने तडाख्यात मृत्यू पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबियांना दोन ते अडीच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घोषित केली.अ‍ॅम्फन चक्रीवादळग्रस्त राज्यातील लोकांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असा आश्वासक शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. पश्चिम बंगालमधील विध्वंसाची दृश्ये मी पाहिली आहेत. ही आव्हानात्मक घडी आहे. संपूर्ण देश पश्चिम बंगालच्या पाठीशी आहे, असे त्यांनी टष्ट्वीट केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशी संपर्क साधून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.चक्रीवादळग्रस्त पश्चिम बंगाल आणि ओडिशातील बचाव व मदत कार्याचा राष्टÑीय संकट व्यवस्थापन समितीने दिल्लीतील बैठकीत आढावा घेतला. चक्रीवादळाची स्थिती आणि दिशा ओळखून भारतीय हवामान खात्याने अचूक अंदाज केल्याने वेळीच या दोन्ही राज्यांतील किनारपट्टी भागात एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आल्याने नुकसान कमी झाले.कॅबिनेट सेक्रेटरी राजीव गौबा यांच्या नेतृत्वाखालील समितीने या दोन्ही राज्यांच्या मुख्य सचिवांना सांगितले की, वेळीच एनडीआरएफची पथके तैनात करून या दोन्ही राज्यांतील जवळपास ७ लाख लोकांना सुरक्षित हलविण्यात आले. त्यामुळे १९९९ मधील महाचक्रीवादळाच्या तडाख्याच्या तुलनेत जीवितहानी कमी झाली. जलदगतीने पुनर्वसन करण्यासाठी एनडीआरएफची अतिरिक्त पथके पश्चिम बंगालमध्ये विशेषत: कोलकाताकडे रवाना झाली आहेत.चक्रीवादळाच्या तडाख्याने झालेल्या जीवित आणि वित्तीय हानीचा अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला. मी माझ्या आयुष्यात एवढे भयानक चक्रीवादळ आणि विध्वंस पाहिला नव्हता. केंद्राने राज्याला सर्वतोपरी मदत करावी. चक्रीवादळग्रस्त भागाचा मी लवकरच दौरा करणार आहे. या भागात पुनर्वसनाचे कामही सुरू केले जाईल. - ममता बॅनर्जी

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालCyclone Amphanअम्फान चक्रीवादळOdishaओदिशाBangladeshबांगलादेश