शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

Cyclone Amphan : ‘अ‍ॅम्फन’च्या तडाख्याने पश्चिम बंगालमध्ये ७२ ठार, ओडिशातही धूळधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 05:59 IST

हजारो लोक बेघर झाले असून पश्चिम बंगालच्या दीघा किनारपट्टीला धडकलेल्या या विक्राळ चक्रीवादळाने पश्चिम बंगालसोबत ओडिशातही भयंकर हैदोस घातला.

कोलकाता/भुवनेश्वर : ताशी १९५ किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासोबत धडकलेल्या ‘अ‍ॅम्फन’ चक्रीवादळाने पश्चिम बंगालमध्ये ७२ लोकांचा बळी घेत भयानक धूळधाण केली. हजारो लोक बेघर झाले असून पश्चिम बंगालच्या दीघा किनारपट्टीला धडकलेल्या या विक्राळ चक्रीवादळाने पश्चिम बंगालसोबत ओडिशातही भयंकर हैदोस घातला. वेगवान वाºयासोबत आलेल्या जोरदार पावसाने सखल भाग जलमय झाले असून मातीची घरे आणि उभी पिके उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक ठिकाणी उभी झाडे आणि विजेचे खांब उखडून पडले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी या हानीची हवाई पाहणी करणार आहेत.पश्चिम बंगालमधील उत्तर आणि दक्षिण २४ परगणा हे दोन जिल्हे अ‍ॅम्फन चक्रीवादळाच्या तडाख्याने पूर्णत: उद्ध्वस्त झाले आहेत. ओडिशातील किनारपट्टीवरील अनेक भागांत वीज आणि दूरध्वनी सेवा ठप्प झाली असून ओडिशातील जवळपास ४४ लाखांहून अधिक लोकांना तडाखा बसला आहे. प. बंगाल आणि ओडिशात धूळधाण करणाºया या चक्रीवादळाने बांगलादेशातही १० लोक ठार झाले असून बांगलादेशातील किनारपट्टीवरील अनेक गावे उद्ध्वस्त झाली आहेत.उत्तर आणि दक्षिण २४ परगणा तसेच कोलकाता बुधवारी सायंकाळपासून अंधारात आहे. दूरध्वनी आणि मोबाईल सेवाही ठप्प आहे. यावेळी चक्रीवादळाने तडाख्यात मृत्यू पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबियांना दोन ते अडीच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घोषित केली.अ‍ॅम्फन चक्रीवादळग्रस्त राज्यातील लोकांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असा आश्वासक शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. पश्चिम बंगालमधील विध्वंसाची दृश्ये मी पाहिली आहेत. ही आव्हानात्मक घडी आहे. संपूर्ण देश पश्चिम बंगालच्या पाठीशी आहे, असे त्यांनी टष्ट्वीट केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशी संपर्क साधून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.चक्रीवादळग्रस्त पश्चिम बंगाल आणि ओडिशातील बचाव व मदत कार्याचा राष्टÑीय संकट व्यवस्थापन समितीने दिल्लीतील बैठकीत आढावा घेतला. चक्रीवादळाची स्थिती आणि दिशा ओळखून भारतीय हवामान खात्याने अचूक अंदाज केल्याने वेळीच या दोन्ही राज्यांतील किनारपट्टी भागात एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आल्याने नुकसान कमी झाले.कॅबिनेट सेक्रेटरी राजीव गौबा यांच्या नेतृत्वाखालील समितीने या दोन्ही राज्यांच्या मुख्य सचिवांना सांगितले की, वेळीच एनडीआरएफची पथके तैनात करून या दोन्ही राज्यांतील जवळपास ७ लाख लोकांना सुरक्षित हलविण्यात आले. त्यामुळे १९९९ मधील महाचक्रीवादळाच्या तडाख्याच्या तुलनेत जीवितहानी कमी झाली. जलदगतीने पुनर्वसन करण्यासाठी एनडीआरएफची अतिरिक्त पथके पश्चिम बंगालमध्ये विशेषत: कोलकाताकडे रवाना झाली आहेत.चक्रीवादळाच्या तडाख्याने झालेल्या जीवित आणि वित्तीय हानीचा अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला. मी माझ्या आयुष्यात एवढे भयानक चक्रीवादळ आणि विध्वंस पाहिला नव्हता. केंद्राने राज्याला सर्वतोपरी मदत करावी. चक्रीवादळग्रस्त भागाचा मी लवकरच दौरा करणार आहे. या भागात पुनर्वसनाचे कामही सुरू केले जाईल. - ममता बॅनर्जी

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालCyclone Amphanअम्फान चक्रीवादळOdishaओदिशाBangladeshबांगलादेश