शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

काश्मीरमधील संचारबंदी उठली

By admin | Updated: October 15, 2016 13:41 IST

परिस्थितीत होत असलेली सुधारणा पाहता काश्मीरमधील संचारबंदी अखेर उठवण्यात आली आहे. मात्र अशांतता कायम असल्याने सामान्य जीवन अजूनही विस्कळीत आहे.

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 15 - परिस्थितीत होत असलेली सुधारणा पाहता काश्मीरमधील संचारबंदी अखेर उठवण्यात आली आहे. मात्र अशांतता कायम असल्याने सामान्य जीवन अजूनही विस्कळीत आहे. जुलै महिन्यात हिजबूल मुजाहिद्दीनचा कमांडर बु-हान वानीच्या मृत्यूनतंर काश्मीरमध्ये अशांतता परसली होती. काश्मीरमध्ये कोठेही संचारबंदी नसून खो-यातील लोकांच्या हालचालींवरील बंदीही उठवण्यात आली आहे अशी माहिती पोलीस अधिका-याने दिली आहे. 
 
संचारबंदी उठवण्यात आली असली तरी खो-यात जमावबंदीचा आदेश अद्यापही लागू आहे. संवेदनशील भागांमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तसंच सुरक्षित असल्याची खात्री लोकांना पटावी यासाठी सुरक्षा जवान तैनात करण्यात आल्याचंही अधिका-याने सांगितलं आहे. 
 
तीन महिन्यांपासून बंद करण्यात आलेली प्रीपेड फोनवरील कॉल करण्याची सुविधादेखील पुन्हा सुरु करण्यात आली आहे. मात्र मोबाईल इंटरनेट सेवा अद्यापही ठप्प आहे. काश्मीरममधील सामान्य जीवन विस्कळीत होऊन 99 दिवस झाले आहेत. रविवारी 100 दिवस पूर्ण होतील. बु-हान वानीच्या मृत्यूनंतर काश्मीरमधील जनजीवन विस्कळीत झालं होतं. सुरक्षा जवान आणि लोकांमध्ये सुरु असलेल्या संघर्षामुळे सर्व सेवा ठप्प पडल्या होत्या. एकूण 84 लोकांनी आपली जीव गमावला ज्यामध्ये दोन सुरक्षा जवानांचादेखील समावेश आहे.