शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

सरकारच्या धोरणांवर टीका करणे देशविरोधी म्हणता येणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2023 11:00 IST

केंद्राने वृत्त वाहिनीवर घातलेली बंदी न्यायालयाने उठवली

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : मल्याळम वृत्त वाहिनीवरील केंद्र सरकारची बंदी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी उठवली. सर्वोच्च न्यायालयाने यावेळी म्हटले की, सरकारच्या धोरणांवर टीका करणे देशविरोधी म्हणता येणार नाही. तथ्यांशिवाय राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे वाहिनीवर मांडल्याविषयी हवेत कारवाई केल्याबद्दल केंद्रीय गृह मंत्रालयावर न्यायालयाने यावेळी नाराजी व्यक्त केली.

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सुरक्षेच्या कारणास्तव ‘मीडियावन’च्या प्रसारणावर बंदी घालण्याचा केंद्राचा निर्णय कायम ठेवणारा केरळ उच्च न्यायालयाचा आदेश रद्दबातल केला. त्यामुळे प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्यावर फार वाईट परिणाम होणार असल्याने त्यांच्यावर सरकार अवाजवी बंधने घालू शकत नाही, असे खंडपीठाने म्हटले आहे. या खंडपीठात न्यायमूर्ती हिमा कोहली यांचाही समावेश होता.

सर्वोच्च न्यायालय म्हणाले...

  • वाहिनीच्या सरकारच्या धोरणांविरुद्धच्या टीकात्मक मतांना सत्ताविरोधी म्हणता येणार नाही. कारण एका मजबूत लोकशाहीसाठी स्वतंत्र प्रसार माध्यमे आवश्यक आहेत.
  • सत्तेसमोर सत्य बोलणे आणि नागरिकांसमोर कठोर तथ्ये मांडणे, हे पत्रकारांचे कर्तव्य आहे, ज्याच्या मदतीने ते लोकशाहीला योग्य दिशेने घेऊन जातील, असे पर्याय निवडू कतात.असावे.
  • सामाजिक - आर्थिक राजकारणापासून राजकीय विचारसरणीपर्यंतच्या मुद्द्यांवर एकसारखे विचार लोकशाहीला मोठा धोका निर्माण करू शकतात.
  • वाहिनीच्या परवान्याचे नूतनीकरण न करणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावर बंधने आहेत.
  • सरकार राष्ट्रीय सुरक्षेचा वापर करून नागरिकांना कायद्यांतर्गत केलेल्या तरतुदींपासून वंचित ठेवत आहे.
  • राष्ट्रीय सुरक्षेचे दावे हवेत केले जाऊ शकत नाहीत. ते सिद्ध करण्यासाठी ठोस तथ्य

सीलबंद लिफाफ्यात माहिती देणे म्हणजे...

सुरक्षेच्या कारणास्तव वाहिनीला परवानगी न देण्याचे कारण न सांगणे आणि केवळ सीलबंद लिफाफ्यात न्यायालयाला माहिती देऊन नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे उल्लंघन करण्यात आल्याने खंडपीठाने खडसावले. गोपनियतेच्या दाव्यांचे मूल्यांकन करण्यासाठी ॲमिकस क्युरींची (न्यायालयाचे मित्र) नियुक्ती करावी आणि न्यायालयाला तर्कसंगत आदेश पारित करण्यात मदत करावी.

मृत्यूची खिंड...

सिक्कीमची राजधानी गंगटोकमधील नथूला खिंडीजवळ मंगळवारी झालेल्या हिमस्खलनानंतर बुधवारीही बचावकार्य सुरू होते. या दुर्घटनेत ७ पर्यटकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चार पुरुष, दोन महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. दुर्घटनेत पाच-सहा वाहने बर्फाखाली अडकली होती, यात ३० लोक होते. सहा पर्यटकांसह २३ जणांना वाचवण्यात यश आले. त्यातील ११ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना  रुग्णालयात दाखल केले आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयGovernmentसरकारMediaमाध्यमे