शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

सरकारच्या धोरणांवर टीका करणे देशविरोधी म्हणता येणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2023 11:00 IST

केंद्राने वृत्त वाहिनीवर घातलेली बंदी न्यायालयाने उठवली

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : मल्याळम वृत्त वाहिनीवरील केंद्र सरकारची बंदी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी उठवली. सर्वोच्च न्यायालयाने यावेळी म्हटले की, सरकारच्या धोरणांवर टीका करणे देशविरोधी म्हणता येणार नाही. तथ्यांशिवाय राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे वाहिनीवर मांडल्याविषयी हवेत कारवाई केल्याबद्दल केंद्रीय गृह मंत्रालयावर न्यायालयाने यावेळी नाराजी व्यक्त केली.

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सुरक्षेच्या कारणास्तव ‘मीडियावन’च्या प्रसारणावर बंदी घालण्याचा केंद्राचा निर्णय कायम ठेवणारा केरळ उच्च न्यायालयाचा आदेश रद्दबातल केला. त्यामुळे प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्यावर फार वाईट परिणाम होणार असल्याने त्यांच्यावर सरकार अवाजवी बंधने घालू शकत नाही, असे खंडपीठाने म्हटले आहे. या खंडपीठात न्यायमूर्ती हिमा कोहली यांचाही समावेश होता.

सर्वोच्च न्यायालय म्हणाले...

  • वाहिनीच्या सरकारच्या धोरणांविरुद्धच्या टीकात्मक मतांना सत्ताविरोधी म्हणता येणार नाही. कारण एका मजबूत लोकशाहीसाठी स्वतंत्र प्रसार माध्यमे आवश्यक आहेत.
  • सत्तेसमोर सत्य बोलणे आणि नागरिकांसमोर कठोर तथ्ये मांडणे, हे पत्रकारांचे कर्तव्य आहे, ज्याच्या मदतीने ते लोकशाहीला योग्य दिशेने घेऊन जातील, असे पर्याय निवडू कतात.असावे.
  • सामाजिक - आर्थिक राजकारणापासून राजकीय विचारसरणीपर्यंतच्या मुद्द्यांवर एकसारखे विचार लोकशाहीला मोठा धोका निर्माण करू शकतात.
  • वाहिनीच्या परवान्याचे नूतनीकरण न करणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावर बंधने आहेत.
  • सरकार राष्ट्रीय सुरक्षेचा वापर करून नागरिकांना कायद्यांतर्गत केलेल्या तरतुदींपासून वंचित ठेवत आहे.
  • राष्ट्रीय सुरक्षेचे दावे हवेत केले जाऊ शकत नाहीत. ते सिद्ध करण्यासाठी ठोस तथ्य

सीलबंद लिफाफ्यात माहिती देणे म्हणजे...

सुरक्षेच्या कारणास्तव वाहिनीला परवानगी न देण्याचे कारण न सांगणे आणि केवळ सीलबंद लिफाफ्यात न्यायालयाला माहिती देऊन नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे उल्लंघन करण्यात आल्याने खंडपीठाने खडसावले. गोपनियतेच्या दाव्यांचे मूल्यांकन करण्यासाठी ॲमिकस क्युरींची (न्यायालयाचे मित्र) नियुक्ती करावी आणि न्यायालयाला तर्कसंगत आदेश पारित करण्यात मदत करावी.

मृत्यूची खिंड...

सिक्कीमची राजधानी गंगटोकमधील नथूला खिंडीजवळ मंगळवारी झालेल्या हिमस्खलनानंतर बुधवारीही बचावकार्य सुरू होते. या दुर्घटनेत ७ पर्यटकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चार पुरुष, दोन महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. दुर्घटनेत पाच-सहा वाहने बर्फाखाली अडकली होती, यात ३० लोक होते. सहा पर्यटकांसह २३ जणांना वाचवण्यात यश आले. त्यातील ११ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना  रुग्णालयात दाखल केले आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयGovernmentसरकारMediaमाध्यमे