शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
3
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
4
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
7
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
8
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
9
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
10
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
11
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
12
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
13
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
14
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
15
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
16
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
17
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
18
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
19
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
20
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
Daily Top 2Weekly Top 5

संकटमोचक ११२!

By admin | Updated: June 30, 2015 01:44 IST

संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या दिल्लीतील भीषण निर्भया हत्याकांडानंतर तब्बल अडीच वर्षांनी सरकारने अखेर देशव्यापी आपत्कालीन फोन सेवेच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे.

नितीन अग्रवाल , नवी दिल्लीसंपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या दिल्लीतील भीषण निर्भया हत्याकांडानंतर तब्बल अडीच वर्षांनी सरकारने अखेर देशव्यापी आपत्कालीन फोन सेवेच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. अमेरिकेतील ९११ क्रमांकाच्या धर्तीवर आता भारतातही ११२ हा तीन अंकी क्रमांक महिलांसाठी संकटमोचकाचे काम करणार आहे.येत्या दीड वर्षात ही सेवा सुरू करण्याचा मोदी सरकारचा मानस आहे. ही सेवा प्रामुख्याने संकट काळात महिलांना अत्यंत मदतीची ठरणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने नॅशनल इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टिम (एनईआरएस) नामक ही तीन अंकी आपत्कालीन सेवा सुरू करण्यासाठी प्रस्ताव मागितले आहेत. १,००० कोटी रुपयांवर टर्नओव्हर असलेल्या आयटी कंपन्यांनाही ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुढील पाच वर्षे एनईआरएस स्थापित करून ती चालविण्यासंदर्भात प्रस्ताव देता येईलनिर्भयाच्या नावावर सुरू करण्यात येणाऱ्या या क्रमांकावर पहिल्या वर्षी सुमारे १८ कोटी कॉल्स (दर दिवसाला ५ लाख) येतील आणि पुढील पाच वर्षांत ही संख्या दुप्पट म्हणजे ३६ कोटींवर जाऊ शकते, असा गृहमंत्रालयाचा अंदाज आहे.अशी असेल व्यवस्था- गृहमंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे देशभरातील असंख्य केंद्रांचा समावेश असलेले एक नेटवर्क असेल. अडचणीच्या वेळी लँडलाईन, मोबाईल, एसएमएस, चॅट, ई-मेल, व्हीओआयपी, सार्वजनिक परिवहनमधील पॅनिक बटण, मोबाईल अ‍ॅप्लिकेशन अथवा इंटरनेट आदी कुठल्याही माध्यमाने यावर मदत मागता येईल. ४अत्याधुनिक कॉल सेंटर कॉलरचे लोकेशन शोधून सर्वांत जवळच्या पोलीस चौकीला त्वरित मदत करण्याचे निर्देशही देतील. अडचणीतील लोकांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी जीपीएस आणि सर्व प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.४१६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीतील निर्भया बलात्कार व हत्याकांडानंतर ही योजना आखण्यात आली होती. निर्भया पोर्टल४तीन अंकी क्रमांकासोबतच निर्भया पोर्टलही तयार करण्यात येईल. थेट कॉल करण्यास इच्छुक नसलेल्या महिला या पोर्टलच्या माध्यमाने मदत मागतील.