शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

दार्जिलिंग चहाचा बाजारात तुटवडा, गोरखालँड आंदोलनाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 01:11 IST

स्वतंत्र गोरखालँड राज्यासाठी गोरखा जनमुक्ती मोर्चाने गेले ४५ दिवस चालविलेल्या आंदोलनाचा चहाचे उत्पादन व लिलाव यांवर मोठा परिणाम झाला असून येथील चहाच्या किमतीमध्ये गेल्या महिन्याभरात ५0 ते १00 टक्के इतकी वाढ झाली आहे.

मुंबई : स्वतंत्र गोरखालँड राज्यासाठी गोरखा जनमुक्ती मोर्चाने गेले ४५ दिवस चालविलेल्या आंदोलनाचा चहाचे उत्पादन व लिलाव यांवर मोठा परिणाम झाला असून, येथील चहाच्या किमतीमध्ये गेल्या महिन्याभरात ५0 ते १00 टक्के इतकी वाढ झाली आहे. तसेच तेथील प्रीमियम दर्जाच्या चहाचे लिलावही बंद पडले आहेत.गोलखालँड आंदोलनाचा पहिला फटका दार्जिलिंग व ईशान्येकडील राज्यांच्या पर्यटनाला बसला. आता दार्जिलिंग भागातील प्रमुख उत्पादन असलेल्या चहावरही त्याचा परिणाम होत आहे. या आंदोलनांमुळे दार्जिलिंगमधील चहाचे ८७ मळे बंद झाले आहेत. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत उत्पादन घटले असून, तुटवड्यामुळे चहाच्या किमती वेगाने वाढत आहेत.आंदोलनाचा सर्वाधिक फटका मळ्यांमध्ये काम करणा-या मजुरांना बसला आहे. चहाच्या सर्व ८७ मळ्यांतील काम बंद झाल्यामुळे, त्यात काम करणाºया तब्बल ७५ हजार मजुरांवर बेकारीचे संकट ओढावले आहे. चहाच्या मळ्यांतील काम १५ जूनपासून बंद असून, त्यामुळे मळेमालकांचेही २५0 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.संपूर्ण दार्जिलिंग परिसराचे झालेले नुकसान ४00 कोटी रुपयांच्या घरात आहे. दार्जिलिंग परिसरातील लोकांचे जीवनमान पूर्णपणे चहाचे उत्पादन व पर्यटनावर अवलंबून आहे. येथील एकूण महसुलापैकी ९0 टक्के उत्पन्न चहा व पर्यटनातून येते. या दोन्ही महत्त्वाच्या स्रोतांवर कुºहाडच कोसळली आहे.गोरखालँड आंदोलनाचा परिणाम ईशान्य भारताच्या अर्थव्यवस्थेवरही झाला आहे. चिकन्स नेक नावाने ओळखल्या जाणाºयाआणि ईशान्येकडील राज्यांना जोडणाºया भागात हे आंदोलन सुरू आहे. इथूनच सिक्किमला अन्नधान्ये व इंधनाचा पुरवठा होतो. तो सध्या बंद आहे.सिक्किमचे मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांनीही त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. सिक्किममध्ये यामार्गे येणा-या पर्यटकांचे प्रमाणही ८0 टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे सिक्किम सरकारने पश्चिम बंगाल सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे.या आंदोलनामुळे आमचे काही हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा सिक्किमचा दावा आहे.ब्रिटिशांना आवडतो दार्जिलिंगचा चहा, इंग्लंडमध्ये मानाचे स्थान भारतात ब्रिटिशांची सत्ता असताना सिव्हिल सर्जन आर्थर कॅम्पबेल यांची १८३९ साली काठमांडूहून दार्जिलिंगला बदली झाली. त्यांनी १८४१मध्ये कुमाऊवरुन काही चहाची रोपे आणून दार्जिलिंगला लावली. त्यांच्या या कामाला १८४७मध्ये वेग आला आणि तिथे चहाची लागवड वाढत गेली.ब्रिटिशांनी १८५0 साली दार्जिलिंगमध्ये चहाची लागवड आणि विक्री सुरू केली. आजच्या घडीला १७ हजार ५00 हेक्टर क्षेत्रावर सुमारे ९0 लाख किलो चहाचे उत्पादन होते. ब्रिटिशांना दार्जिलिंगचा चहा आवडत असे आणि आजही त्या चहाला इंग्लंडमध्येही मानाचे स्थान आहे.