शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

हाणामारीच्या घटनांचा आलेख उंचावला दोन दिवसात ६ घटना : तरुणाईचे समुपदेशन करण्याची गरज

By admin | Updated: April 5, 2016 00:15 IST

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून शहरात हाणामारीच्या घटनांचा आलेख उंचावला आहे. क्षुल्लक कारणांवरून तरुणांमध्ये हाणामारी होत असल्याच्या घटना एक किंवा दोन दिवसाआड समोर येत आहेत. गेल्या दोन दिवसातच तब्बल ६ घटना घडल्या असून असे प्रकार चिंताजनक आहेत. किरकोळ स्वरुपाच्या कारणाने तरुणांच्या गटात होणार्‍या मारहाणीमुळे भविष्यात दंगलीसारखा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनासह सामाजिक संस्थांनी तरुणाईचे समुपदेशन केले पाहिजे, अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून शहरात हाणामारीच्या घटनांचा आलेख उंचावला आहे. क्षुल्लक कारणांवरून तरुणांमध्ये हाणामारी होत असल्याच्या घटना एक किंवा दोन दिवसाआड समोर येत आहेत. गेल्या दोन दिवसातच तब्बल ६ घटना घडल्या असून असे प्रकार चिंताजनक आहेत. किरकोळ स्वरुपाच्या कारणाने तरुणांच्या गटात होणार्‍या मारहाणीमुळे भविष्यात दंगलीसारखा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनासह सामाजिक संस्थांनी तरुणाईचे समुपदेशन केले पाहिजे, अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
तरुणांमध्ये घडणार्‍या हाणामारीच्या घटनांमुळे शहरातील कायदा व सुव्यस्थेला गालबोट लागत आहे. असे असताना पोलीस प्रशासनाकडून कोणत्याही स्वरुपाच्या उपाययोजना होत नसल्याचे दिसून येत आहे. हाणामारीचा प्रकार घडल्यानंतर संबंधिताची फिर्याद अथवा तक्रार दाखल करून घेण्यापलीकडे पोलिसांकडून फारसे प्रयत्न होत नाही. तरुणांमध्ये झालेल्या वादातून शांततेला गालबोट लागल्याच्या घटनादेखील मागील एक ते दीड महिन्यांच्या काळात घडल्या. शनिपेठेतील दंगल याचेच उदाहरण आहे. तरुणांमधील वादातून पोलीस ठाण्याच्या आवारातच रात्री दंगल उसळली. त्यानंतरही ठोस उपाययोजना पोलीस प्रशासनाने केलेल्या नाहीत.
दोन दिवसात सहा घटना
गेल्या दोन दिवसाच्या काळात शहरात विविध ठिकाणी तरुणांमधील हाणामारीच्या तब्बल सहा घटना घडल्याचे समोर आले आहे. त्यात १ एप्रिलला रात्री पावणे दहा वाजता सौरभ शिंपी व धीरज चिरमाडे या तरुणांना मारहाण झाली. त्यानंतर १०.३० वाजता विलास वराडे या बस चालकास गुजराल पेट्रोल पंपाजवळ दोघांनी मारहाण केली. २ एप्रिलला दुपारी ४.३० वाजता राहुल पाटील या तरुणाचे दगडाने डोके फोडले. याच दिवशी समतानगरात रात्री ११ वाजेच्या सुमारास अक्षय मौर्य या तरुणाला मारहाण झाली. ३ एप्रिलला सायंकाळी ५ वाजता टॉवर चौकात शाकीर शेख शकील उर्फ राजू या तरुणास ५ तरुणांनी बेदम मारहाण केली. तर रात्री १० वाजता जिल्हा रुग्णालयासमोर योगेश सपकाळे याला चार जणांनी मारहाण केली.
उपाययोजना हव्यात
शहरासह महामार्गावर रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारे हॉटेल्स, बिअरबार व खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवर तरुण मद्यप्राशन करतात. त्यानंतर अनेकदा हाणामारीच्या घटना घडतात. म्हणून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून हॉटेल्स लवकर बंद होतील, अशी उपाययोजना करायला हवी. रात्री चौका-चौकात तरुणांचे टोेळके थांबतात. त्यालाही प्रतिबंध घातला पाहिजे. धूम स्टाइल वाहनचालकांवरही नियंत्रण असायला हवे.