शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

अन्नाच्या विषबाधेतून गाईंचा मृत्यू

By admin | Updated: April 11, 2015 01:41 IST

घोगली, गोठाडी, पाथरी परिसरातील घटना : शेतकऱ्यांमध्ये संताप

घोगली, गोठाडी, पाथरी परिसरातील घटना : शेतकऱ्यांमध्ये संताप
फोटो - रॅपमध्ये
नागपूर : उघड्यावर टाकलेले अन्न खाल्यामुळे विषबाधा झाल्याने घोगली, गोठाडी, पाथरी परिसरातील शेतकऱ्यांच्या जवळपास १० गाईंचा मृत्यू झाला आहे. तर १० ते १२ गायी अस्वस्थ असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहे. जनावरांच्या मृत्यूमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने, परिसरातील शेतकरी संतप्त असून, पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रविवार, ५ एप्रिल रोजी घोगली परिसरात रमेश लोखंडे यांच्याघरी लग्न कार्य होते. लग्नकार्य उरकल्यानंतर उरलेले अन्न कॅटरर्सच्या लोकांनी जवळच्या शेताच्या धुऱ्यावर टाकले. दोन ते तीन दिवसानंतर अन्न कुजल्याने, त्यावर बुरशी चढली होती. परिसरातील जनावरांनी पडलेले सडके अन्न खाल्ल्यामुळे अनेक गाई आजारी पडल्या. काही गाईंचा शेतातच मृत्यू झाला. काहींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जवळपास १० गाई मृत्युमुखी पडल्या असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले तर तेवढ्याच गाईंवर उपचार सुरू आहे. कुजलेले अन्न खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. घोगलीतील संतोष वनोकर, नाना रहाटे यांच्या दोन गाईंचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात गावकऱ्यांनी लोखंडे कुटुंबीयांशी संपर्क साधून नुकसान भरपाईची मागणी केली. मात्र त्यांनी कॅटरींगवाल्याकडे बोट दाखवून, याप्रकरणातून हात काढून घेतला. दुभती जनावरे गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकरी पोलिसात तक्रार करणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.