शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

Coronavirus: कोरोना भारतातून संपुष्टात येणार की नाही? व्हॅक्सिन एक्सपर्टचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 18:58 IST

दुसऱ्या लाटेनंतर देशातील एक तृतीयांश लोकसंख्या कोरोनानं प्रभावित झाली आहे.

नवी दिल्ली – जगभरात कोरोना महामारीनं हाहाकार माजवला. लाखो लोकांचे जीव गेले. मागील २ वर्षापासून भारतातही कोरोनामुळे लोक दहशतीच्या सावटाखाली जगत आहेत. कोरोना कधी नष्ट होईल हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात पडला आहे. परंतु देशातील टॉप व्हॅक्सिन एक्सपर्टनं जो काही दावा केला आहे तो आपल्या सगळ्यांची चिंता वाढवणारा आहे. भारतात कोरोना व्हायरस संक्रमण एंडेमिसिटी दिशेने पुढे जात आहे. याचा अर्थ असा की देशात कधीही न संपुष्टात येणारा आजार बनणारा आहे असं व्हॅक्सिन एक्सपर्ट डॉक्टर गगनदीप कांग यांनी म्हटलं आहे.

लोकांना व्हायरससोबत जगावं लागेल

डॉक्टर कांग म्हणाले की, स्थानिक पातळीवर कोरोना संक्रमण(Coronavirus) पुन्हा वाढल्यानं देशात कोरोना महामारी तिसऱ्या लाटेचं रुपांतर घेईल. परंतु ही लाट पूर्वीच्या लाटेप्रमाणे नसेल. कुठल्याही आजारासाठी एंडेमिक हा टप्पा आहे ज्यात लोकं त्या व्हायरससोबत जगणं शिकतात. ही महामारी खूप वेगळी आहे. मोठ्या संख्येने लोकांना त्याच्या विळख्यात अडकवत आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत डॉक्टर गगनदीप कांग यांनी भारतातील कोविड १९ च्या परिस्थितीवर भाष्य केले आहे.

दुसऱ्या लाटेनंतर देशातील एक तृतीयांश लोकसंख्या कोरोनानं प्रभावित झाली आहे. दुसऱ्या लाटेत आपण तेच आकडे आणि तोच पॅटर्न पाहिला का? त्यामुळे आगामी काळात त्याची शक्यताही कमी आहे. स्थानिक स्तरावर संक्रमण वाढेल परंतु ते कमी प्रमाण असेल परंतु देशभरात पसरेल. देशात तिसरी लाट येऊ शकते जर आपण सण उत्सावाबद्दल आपलं वागणं नाही बदललं असं त्यांनी सांगितले.

सध्यातरी कोरोना संपणार नाही

त्याचसोबत कोविड भारतात एंडेमिक स्थितीच्या दिशेने जात आहे. वेल्लोर क्रिश्चियन मेडिकल कॉलेजचे प्रोफेसर कांग म्हणाले की, जेव्हा तुमच्याकडे काही असं आहे जे नजीकच्या भविष्यात कधीही संपणारं नाही. मग ते एंडेमिक स्थितीच्या दिशेने जात आहे. सध्या आपण SARS COV 2 म्हणजे कोविड व्हायरस संपुष्टात आणण्यासाठी काम करत नाहीये कारण कोरोना एंडेमिक बनणार आहे.

दरम्यान, आपल्या देशात एंडेमिक आजार आहेत जसं इंफ्लूएंजा परंतु कोरोनामध्ये एंडेमिकसह महामारीचा धोकाही आहे. उदाहरण द्यायचं झालं तर कोरोना व्हायरसचा कुठलाही नवा व्हेरिएंट आला ज्याच्याशी लढण्याशी क्षमता आपल्या शरीराकडे नाही तर पुन्हा कोरोना महामारीचं रुप घेऊ शकतो. कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उत्तम व्हॅक्सिन विकसित करण्यावर भर द्यायला हवा असंही डॉ. गगनदीप कांग यांनी मुलाखतीत सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस