शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सर्जिकल स्ट्राईकदरम्यान अनवधानानं LOC ओलांडून पाकिस्तानात पोहोचलेले जवान चंदू चव्हाण दोषी, 3 महिन्यांची शिक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 11:57 IST

भारतानं 2016मध्ये पाकव्याप्त काश्मीरात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकदरम्यान अनवधानानं नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेलेले भारतीय जवान चंदू चव्हाण यांना लष्करी न्यायालयानं दोषी ठरवलं आहे.

नवी दिल्ली : भारतानं 2016मध्ये पाकव्याप्त काश्मीरात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकदरम्यान अनवधानानं नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेलेले भारतीय जवान चंदू चव्हाण यांना लष्करी न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. चंदू चव्हाण यांनी तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नियंत्रण रेषा ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण यांना दोषी ठरवण्यात आले आहे. 

2016 मध्ये सप्टेंबर महिन्यात भारतीय लष्कराकडून पाकिस्तानविरोधात करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकदरम्यान  37 राष्ट्रीय रायफल्समधील जवान चंदू चव्हाण हे  नजरचुकीनं पाकिस्तानात पोहोचले होते. 29 सप्टेंबर 2016 रोजी त्यांनी नियंत्रण रेषा ओलांडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ अधिका-यांवर नाराज होऊन चंदू चव्हाण पाकिस्तानात गेले होते. मात्र,  यानंतर भारतानं सर्वोतोपरी प्रयत्न करत त्यांना 21 जानेवारीला पुन्हा मायदेशी सुखरुप आणले. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयानं चंदू चव्हाण यांनी तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. मात्र या शिक्षेवर अंतिम स्वरुपात शिक्कामोर्तब होणं अद्याप बाकी आहे.  दरम्यान, या शिक्षेविरोधात चंदू चव्हाण अपीलदेखील करू शकतात. 

कसे पोहोचले होते चंदू चव्हाण पाकिस्तानात?28 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय लष्कराने मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केले. या कारवाईत भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांचे तळे उद्ध्वस्त केली. यानंतर काही वेळाने चंदू चव्हाण यांनी नकळत नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात पोहोचले, अशी माहिती समोर आली. यावर भारतीय सैनिक पकडल्याची माहितीही पाकिस्तानी संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून देण्यात आली होती.

21 जानेवारीला भारताकडे सोपवलेजवान चंदू चव्हाण 29 सप्टेंबर 2016 रोजी चुकून नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. डॉ. भामरे यांनी सातत्याने यासंदर्भात पाठपुरावा चालविला होता. यास यश मिळून 21 जानेवारीला अमृतसर येथील वाघा बॉर्डर येथे चव्हाण यांना भारताच्या स्वाधीन करण्यात आले. स्वत: डॉ. भामरे या वेळी उपस्थित होते.  

 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान