शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

शस्त्रक्रिया प्रकरणाची न्यायालयीन चौकशी

By admin | Updated: November 14, 2014 02:34 IST

13 महिलांच्या मृत्यूनंतर चहुबाजूंनी टीकेचा भडिमार सहन कराव्या लागणा:या छत्तीसगड सरकारने या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत़

बिलासपूर : कुटुंब नियोजन शिबिरात नसबंदी शस्त्रक्रिया झालेल्या 13 महिलांच्या मृत्यूनंतर चहुबाजूंनी टीकेचा भडिमार सहन कराव्या लागणा:या छत्तीसगड सरकारने या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत़
दरम्यान, शिबिरात काही तासांत 83 महिलांची नसबंदी करणारे मुख्य शल्यविशारद डॉ़ आऱ के.गुप्ता यांना अटक करण्यात आली असून पीडितांना कथितरीत्या निकृष्ट दर्जाची औषधे पुरविणा:या रायपूरस्थित महावर फार्मा प्राय़ लि़ कंपनीच्या कार्यालयास सील ठोकण्यात आले आह़े
 बिलासपूर जिल्ह्याच्या पेंडारी गावात चार दिवसांपूर्वी आयोजित शिबिरात 83 महिलांवर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली होती.  उपचारादरम्यान यापैकी 13 महिलांचा मृत्यू झाला आह़े अद्यापही 49 महिला रुग्णालयात आहेत़ 
या प्रकरणी छत्तीसगड सरकारने गुप्ता यांच्यासह चार वैद्यकीय अधिका:यांना निलंबित करीत डॉ़ गुप्तांविरुद्ध एफआयआर दाखल केला होता़ बुधवारी रात्री उशिरा गुप्ता यांना अटक करण्यात आली़ 
गुरुवारी मुख्यमंत्री रमणसिंह यांनी या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिल़े शस्त्रक्रिया झाल्यानंतर आजारी झालेल्या आणि वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल असलेल्या 52 महिलांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली़ यापैकी दोन महिला व्हेंटिलेटरवर आहेत़ तिघी जणींचे डायलिसिस सुरू असल्याचे त्यांनी सांगितल़े  
दरम्यान, भारतात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर 13 महिलांचा मृत्यू होण्याची घटना चिंताजनक असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख बान की मून यांनी म्हटले आहे.  (वृत्तसंस्था)
 
 
 
 
मी गेल्या अनेक वर्षापासून नसबंदीच्या शस्त्रक्रिया करीत आह़े यादरम्यान मी सुमारे 5क् हजार महिलांची नसबंदी केली आह़े इतक्या वर्षाच्या काळात असे कधीही घडले नाही़ शस्त्रक्रियेपूर्वी साहित्य पूर्णत: निजर्तुक करण्यात आले होत़े खरेदी करण्यात आलेल्या औषधांची योग्य तपासणी करण्यात आली नव्हती़ चांगल्या कंपनीची औषधे दिली गेली असती तर आज ही घटना घडली नसती़ मीडियातील बातम्यांनुसार, शिबिरासाठी स्थानिक औषधे पुरविण्यात आली होती, असेही ते म्हणाल़े
 
 कोट
मला या प्रकरणात गोवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. अन्य वैद्यकीय अधिकारी निलंबित आहेत़ त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी़ प्रशासन स्वत:ला वाचविण्यासाठी मला फसवत आह़े
-डॉ़ आऱ के.गुप्ता, नसबंदी शस्त्रक्रिया करणारे मुख्य डॉक्टर
 
  
 
4छत्तीसगडच्या बिलासपूर जिल्ह्यात शस्त्रक्रियेनंतर 13 महिलांच्या मृत्यूप्रकरणी काल बुधवारी रात्री उशिरा अटक करण्यात आलेले डॉ़ आऱ के. गुप्ता यांनी पीडित महिलांचा मृत्यू कथितरीत्या निकृष्ट औषधांमुळे झाल्याचा दावा केला आह़े आपल्याला या प्रकरणात नाहक गोवण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला आह़े
 
4शस्त्रक्रियेनंतर महिलांना आयब्रुफेन आणि सिप्रोक्सिन ही वेदनाशामक आणि अॅन्टिबायोटिक औषधे देण्यात आली होती़ औषधे घेतल्यानंतर महिलांना उलटय़ा, पोटदुखी व डोकेदुखी सुरू झाली़ यावरून महिलांचा मृत्यू संदिग्ध गुणवत्तेच्या औषधांमुळे झाल्याचे दिसते, असे गुप्ता म्हणाल़े