शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

नितीश यांना सीएमपदावरून हटवण्यासंदर्भातल्या याचिकेवर न्यायालयानं निवडणूक आयोगाकडे मागितलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 16:21 IST

नितीश कुमार हे बिहारच्या मुख्यमंत्रिपदी राहण्यास अयोग्य असल्याच्या दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला नोटीस बजावत उत्तर मागितलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला दोन आठवड्यांत उत्तर देण्याची मुदत दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे वकील एम. एल. शर्मा यांनी नितीश कुमारांविरोधात याचिका दाखल केली असून, नितीश कुमार यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखल असलेले गुन्हे सादर केले नसल्याचा आरोप याचिककर्त्यानं केला आहे.

नवी दिल्ली, दि. 11 - नितीश कुमार हे बिहारच्या मुख्यमंत्रिपदी राहण्यास अयोग्य असल्याच्या दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला नोटीस बजावत उत्तर मागितलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला दोन आठवड्यांत उत्तर देण्याची मुदत दिली आहे.सर्वोच्च न्यायालयाचे वकील एम. एल. शर्मा यांनी नितीश कुमारांविरोधात याचिका दाखल केली असून, नितीश कुमार यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखल असलेले गुन्हे सादर केले नसल्याचा आरोप याचिककर्त्यानं केला आहे. नितीश कुमार यांनी 2004 आणि 2012च्या निवडणुकीतील दाखल प्रतिज्ञापत्रात 1991मध्ये झालेल्या हत्येच्या प्रकरण त्यांच्या विरोधात दाखल असलेल्या एफआयआरचा उल्लेख केलेला नाही. नितीश यांनी प्रतिज्ञापत्रात ही माहिती लपवल्यामुळे त्यांना संवैधानिक पदावर राहण्याच्या अधिकार नसल्याचं या याचिकाकर्त्यानं म्हटलं आहे. तसेच त्यांची विधान परिषद सदस्यताही अयोग्य असल्याचं वकील एम. एल. शर्मा म्हणाले आहेत. काय हे प्रकरण ?बिहारमध्ये जेडीयूनं लालूप्रसाद यादवांच्या पक्षाशी महागठबंधन तोडल्यानंतर लालूंनी नितीश कुमार यांच्याविरोधात गंभीर आरोप केले होते. नितीश कुमार यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा असल्याचा आरोपही लालूंनी केला होता. 26 वर्षांपूर्वी पंडारखा क्षेत्रातील ढीबर गावात राहणा-या अशोक सिंह यांनी नितीश कुमारांसह अन्य लोकांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता.अशोक सिंह यांनी याबाबत दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आरोप केले आहेत की, बाढ जागेवरील मध्यावधी निवडणुकांच्या वेळी सीताराम सिंह यांच्यासोबत मतदान देण्यासाठी मतदान केंद्रावर गेले होते. त्याच वेळी जनता दलाचे उमेदवार नितीश कुमार तेथे आले. त्यांच्यासोबत आमदार दिलीप कुमार सिंह, दुलारचंद यादव, योगेंद्र प्रसाद आणि बौधू यादव उपस्थित होते. सर्व लोकांजवळ बंदूक, रायफल्स आणि पिस्तूल होतं. त्यानंतर नितीश कुमार यांनी माझ्या भावाला जिवानिशी मारण्यासाठी गोळीबार केला. त्यात त्याचा मृत्यू झाला. एफआयआरमध्ये गोळीबारात इतर लोकही जखमी झाल्याचं म्हटलं आहे. मात्र या प्रकरणात नितीश कुमारांविरोधात अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही.