शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

विदेशी पर्यटकांना देशाच्या सीमा झाल्या खुल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 07:10 IST

क्वारंटाइनची अट नाही, ९९ देशांनाच सवलत

ठळक मुद्देगेल्या वर्षी मार्च महिन्यात केंद्र सरकारने विदेशी पर्यटकांना व्हिसा देणे बंद केले होते. पण आता या पर्यटकांना भारतात येताना क्वारंटाइन होण्याची अटही काढून टाकली.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोनाकाळातील सुमारे २० महिन्यांच्या कालावधीनंतर भारताने आता विदेशी पर्यटकांना पुन्हा प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रसार कमी झाला असून लसीकरणाचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे हा सरकारने हा निर्णय घेतला.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात केंद्र सरकारने विदेशी पर्यटकांना व्हिसा देणे बंद केले होते. पण आता या पर्यटकांना भारतात येताना क्वारंटाइन होण्याची अटही काढून टाकली. मात्र ही सवलत ९९ देशांतील पर्यटकांनाच आहे. या पर्यटकांनी भारतात आल्यानंतर स्वत:च्या प्रकृतीकडे १४ दिवस बारीक लक्ष ठेवावे अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे. गेल्या महिन्यापासून चार्टर्ड फ्लाइटने येण्यास विदेशी पर्यटकांना केंद्र सरकारने परवानगी दिली होती. आता पर्यटकांना सोमवारपासून प्रवासी विमानांतून ही भारतात विविध ठिकाणी जाण्याची परवानगी दिली. गेल्या काही आठवड्यांपासून पर्यटकांनी विविध पर्यटनस्थळे फुलून गेली आहेत. गोवा, हिमाचल प्रदेश, लडाख, उत्तराखंड आदी ठिकाणी देशी पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. भारतातील लसीकरण मोहिमेत आजवर ११० कोटींपेक्षा अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. कोरोनाचा झालेल्यांपैकी बहुतांश नागरिक बरे झाल्याचे अँटीबॉडी सर्वेक्षणातून दिसून आले आहे.

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटनcorona virusकोरोना वायरस बातम्या