शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

हा देश संघाच्या विचारांचा कधीच बनू शकणार नाही -सोनिया गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 04:33 IST

हा भारत देश महात्मा गांधींच्या विचारांना मानणारा आहे. काही लोक देशाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बनवण्याचा प्रयत्न करीत असले तरी तसे अजिबात होणार नाही.

नवी दिल्ली : हा भारत देश महात्मा गांधींच्या विचारांना मानणारा आहे. काही लोक देशाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बनवण्याचा प्रयत्न करीत असले तरी तसे अजिबात होणार नाही. कारण गांधीजींचे विचार हाच या देशाचा भक्कम पाया आहे, असे प्रतिपादन काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बुधवारी केले.गांधी जयंतीनिमित्त राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या पदयात्रेच्या समारोपप्रसंगी सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवरही जोरदार टीका केली. केवळ आपल्यालाच सारे काही कळते, असे समजणाऱ्यांना महात्मा गांधी काय समजणार, असा टोला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. भारताची गेल्या पाच वर्षांतील स्थिती पाहून गांधीजींनाही दु:ख झाले असते, असेही त्या म्हणाल्या.महात्मा गांधींचे नाव आज अनेक जण घेत आहेत; पण त्यांच्या मार्गाने चालणे अवघड आहे, असे सांगून सोनिया गांधी म्हणाल्या की, जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राहुल गांधी, नरसिंह राव व डॉ. मनमोहनसिंग यांनी देशाला विकासाच्या मार्गावर नेले; पण आज देशातील तरुण बेरोजगार आहेत, महिला असुरक्षित आहेत. काही जण आता साम- दाम- दंड- भेदाचा वापर करून स्वत:ला शक्तिशाली समजू लागले आहेत.

महात्मा गांधींनी दाखवलेला मार्ग सोडून अन्य रस्त्याने जाणारे याआधीही अनेक झाले; पण तरीही आपला देश भरकटला नाही. गांधीजींचे विचार आजही जिवंत असल्याचे ते उदाहरण आहे. त्यामुळे अनेक येतील आणि जातील. ते वाटेल त्या मार्गाने जातील; पण हा देश गांधीजींनाच कायम मानत राहील, असेही सोनिया गांधी म्हणाल्या.सत्य आणि सत्ताअसत्यावर आधारित राजकारण करणाऱ्यांना गांधीजींचे सत्याचे राजकारण कधीही समजणार नाही. सत्तेसाठी आता काहीही करू पाहणाºयांना गांधीजींचा अहिंसेचा विचार समजणार नाही. सत्ता मिळताच आपण सर्वेसर्वा आहोत, असे समजू लागणाºयांना गांधीजींचा नि:स्वार्थ कळणार नाही, अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्षपणे मोदी सरकारवर टीका केली.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीMahatma Gandhiमहात्मा गांधीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ