शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

देशातील रेल्वेस्थानकांचे खासगीकरण होणार नाही; राज्यसभेत रेल्वेमंत्र्यांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 05:45 IST

शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी देशातील काही रेल्वे स्थानकांचे खासगीकरण करण्यात आले आहे का, असा प्रश्न उपस्थित केला होता.

विकास झाडेनवी दिल्ली : रेल्वे स्थानकांच्या खासगीकरणासंदर्भात अद्याप कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारकडे आला नाही, त्यामुळे खासगीकरणाचा प्रश्न उद्‌भवत नसल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत माहिती दिली.

शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी देशातील काही रेल्वे स्थानकांचे खासगीकरण करण्यात आले आहे का, असा प्रश्न उपस्थित केला होता. ना. वैष्णव म्हणाले, रेल्वे स्टेशन विकास कार्यक्रमांतर्गत कंत्राटदारांना काही ठरावीक काळासाठी रेल्वे परिसरातील पट्टे देण्यात आले आहेत; पण त्याचा मालकी अधिकार हा रेल्वे प्रशासनाकडे आहे. महाराष्ट्रातील विविध भागातील प्रकल्पांची सद्य:स्थिती दर्शविणारी वस्तुस्थिती काय आहे आणि महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने कोणती पावले उचलली? याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला होता.

त्यावर वैष्णव म्हणाले की, रेल्वे प्रकल्प मंजूर राज्यस्तरीय नव्हे तर आणि विभागीय रेल्वेनिहाय असतात. कारण भारतीय रेल्वे नेटवर्क विविध राज्यांच्या हद्दीत पसरलेले आहे. महाराष्ट्र मध्य रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, दक्षिण पश्चिम रेल्वे आणि भारतीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वे क्षेत्राने व्यापला आहे. 

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्प पूर्ण करणारएप्रिल २०२१ पर्यंतचे ९१ हजार १३७ कोटी रुपये खर्चून एकूण ६ हजार १४२ किमी लांबीच्या ३५ प्रकल्प योजना मंजुरीच्या आणि अंमलबजावणीच्या विविध टप्प्यात असून, त्यापैकी ९०६ किलोमीटर लांबीचे मार्ग वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. मार्च २०२१ पर्यंत ११ हजार १८४ कोटी खर्च करण्यात आले आहेत, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेतील प्रश्नोत्तरात दिली. 

टॅग्स :railwayरेल्वेRajya Sabhaराज्यसभाShiv Senaशिवसेना