शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

देशाला समाजवादाची नव्हे, रामराज्याची आवश्यकता : योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 15:08 IST

आयोध्यात दबलेल्या भावनांना एक व्यासपीठ मिळाले आहे. त्यामुळे जगात भारताच्या लोकशाहीचे गुणगाण सुरू झाले. आयोध्येचा निकाल आल्यानंतर गोळी चालवणारे चुकीचे होते हे सिद्ध झालं, असंही योगींनी म्हटले.

नवी दिल्ली - देशाला समाजवादाची नव्हे तर रामराज्याची आवश्यकता असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री योगी बुधवारी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत होते. 

देशाला रामराज्याची गरज आहे. समाजवाद अव्यवहारीक आणि अप्रासंगिक झाला आहे. राम भक्तांवर गोळीबार करणाऱ्यांना मला प्रश्न विचारण्याचा हक्क नाही. अशा लोकांना रामराज्याचा अर्थही समजणार नाही. राम आमच्यासाठी आदर्श आहेत. आराध्य आणि मर्यादा पुरुषोत्तम असल्याचे योगी यांनी म्हटले.  आयोध्येतील रामजन्मभूमी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने नुकताच महत्त्वपूर्ण निर्णय़ दिला आहे.

मुख्यमंत्री सदनात आयपॅड घेऊऩ आलेल्या योगींनी आयपॅडच्या मदतीने भाषण दिले. आयोध्यात दबलेल्या भावनांना एक व्यासपीठ मिळाले आहे. त्यामुळे जगात भारताच्या लोकशाहीचे गुणगाण सुरू झाले. आयोध्येचा निकाल आल्यानंतर गोळी चालवणारे चुकीचे होते हे सिद्ध झालं, असंही योगींनी म्हटले.

योगी आदित्यनाथ यांनी याप्रसंगी राज्यातील समाजवादी पार्टी आणि बसपावर जोरदार टीका केली.  ज्या लोकांनी महिलांवर अत्याचार केले,  असे लोक महिला सशक्तीकरणावर बोलत आहेत. मात्र आता कोणी निरपराध लोकांना त्रास दिला तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यात येईल, असं आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले.