शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
7
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
8
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
9
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
10
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
11
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
12
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
13
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
14
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
15
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
16
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
17
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
18
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
19
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
20
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?

१२० कोटी लोकांचा देश; निरीश्वरवादी फक्त ३३ हजार!

By admin | Updated: July 29, 2016 01:38 IST

१२० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात फक्त ३३ हजार व्यक्ती परमेश्वराचे अस्तित्व न मानणाऱ्या - निरीश्वरवादी असल्याची माहिती जनगणनेच्या आकडेवारीतून

नवी दिल्ली : १२० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात फक्त ३३ हजार व्यक्ती परमेश्वराचे अस्तित्व न मानणाऱ्या - निरीश्वरवादी असल्याची माहिती जनगणनेच्या आकडेवारीतून पुढे आल्याने हा देश श्रद्धावानांचा असल्याचे अधोरेखित झाले आहे.हे गुणोत्तर पाहिले तर ईश्वर न मानणाऱ्यांचे प्रमाण अगदीच नगण्य म्हणजे ०.००२७ टक्के आहे.सन २०११च्या जनगणनेत ज्यांनी स्वत:ची निरीश्वरवादी म्हणून नोंद केली आहे त्यापैकी सुमारे निम्म्या महिला आहेत व ईश्वरावर श्रद्धा नसलेल्या १० भारतीयांपैकी सात भारतीय ग्रामीण भागात राहणारे आहेत.देशभरात निरीश्वरवादी म्हणून नोंद झालेल्यांपैकी सर्वाधिक ९,६५२ व्यक्ती महाराष्ट्रातील आहेत. त्यातही महिला (४,६०८) पुरुषांच्या (५,०४४) जवळजवळ बरोबरीत आहेत. महाराष्ट्रील निरीश्वरवाद्यांपैकी ७१ टक्के खेड्यांमध्ये राहणारे आहेत. शेजारच्या गोव्यात ४७ पुरुष व व १४ महिलांसह एकूण ६१ निरीश्वरवाद्यांची नोंद झाली आहे.जनगणना दर १० वर्षांनी केली जाते. प्रत्येक जनगणनेत माहिती घेताना हा प्रश्न विचारला जातो. अशा जनगणनेतून देशातील निरीश्वरवाद्यांचा आकडा समोर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधीच्या सन २००१च्या जनगणनेच्या अंतिम आकडेवारीत निरीश्वरवाद्यांचा कोणताही नेमका आकडा नमूद न करता फक्त ‘फारच थोड्या लोकांनी आपण निरीश्वरवादी असल्याची नोंद केली,’ असे मोघमपणे नमूद करण्यात आले होते.निरीश्वरवाद्यांमध्ये महाराष्ट्राच्या खालोखाल मेघालयचा (९,०८९) दुसरा क्रमांक लागतो. ईश्वर आणि धर्माचे पूर्णपणे वावडे असलेल्या कम्युनिस्ट विचारसरणीच्या सत्तेत दीर्घ काळ राहिलेल्या केरळ या राज्यात ४,८९६ निरीश्वरवादी नोंदले गेले. त्या तुलनेत पश्चिम बंगालमधील निरीश्वरवाद्यांची संख्या खूपच कमी म्हणजे ७८४ आहे. याखेरीज निरीश्वरवाद्यांची संख्या चार अंकी असलेल्या इतर राज्यांमध्ये उत्तर प्रदेश (२,४२५) व तमिळनाडू (१,२९७) यांचा समावेश आहे. मध्यंतरी सन २०१२मध्ये जगभरातील लोकांच्या धार्मिकतेचा मागोवा घेऊन एक जागतिक निर्देशांक काढण्यात आला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)आकडा जास्तही असू शकतो-जनगणनेत जी नोंद झाली तेवढेच निरीश्वरवादी भारतात असतील, असे खातरीने म्हणता येणार नाही. जनगणना विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, यापेक्षा कितीतरी जास्त लोकांनी (सुमारे २९ लाख-०.२४ टक्के) आपला धर्म सांगितला नाही किंवा धर्माची इतर गोष्टींशी गल्लत केली. -अशा लोकांची ‘धर्म सांगितला नाही’ या वर्गवारीत नोंद केली गेली. त्यामुळे ज्या निरीश्वरवाद्यांनी धर्म सांगितला नाही त्यांच्यापैकी काहींना या वर्गवारीत गणले गेले असू शकते. - शिवाय जनगणनेत कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडून माहिती न घेता एकाच वडीलधाऱ्या व्यक्तीकडून घरातील सर्वांची माहिती घेतली जाते. त्यामुळे कुटुंबातील तरुण पिढी धर्म व देव न मानणारी असली तरी कुटुंबप्रमुख सरकारी नोंदीत ते नोंदवून घेईलच, असे सांगता येत नाही.