शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

१२० कोटी लोकांचा देश; निरीश्वरवादी फक्त ३३ हजार!

By admin | Updated: July 29, 2016 01:38 IST

१२० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात फक्त ३३ हजार व्यक्ती परमेश्वराचे अस्तित्व न मानणाऱ्या - निरीश्वरवादी असल्याची माहिती जनगणनेच्या आकडेवारीतून

नवी दिल्ली : १२० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात फक्त ३३ हजार व्यक्ती परमेश्वराचे अस्तित्व न मानणाऱ्या - निरीश्वरवादी असल्याची माहिती जनगणनेच्या आकडेवारीतून पुढे आल्याने हा देश श्रद्धावानांचा असल्याचे अधोरेखित झाले आहे.हे गुणोत्तर पाहिले तर ईश्वर न मानणाऱ्यांचे प्रमाण अगदीच नगण्य म्हणजे ०.००२७ टक्के आहे.सन २०११च्या जनगणनेत ज्यांनी स्वत:ची निरीश्वरवादी म्हणून नोंद केली आहे त्यापैकी सुमारे निम्म्या महिला आहेत व ईश्वरावर श्रद्धा नसलेल्या १० भारतीयांपैकी सात भारतीय ग्रामीण भागात राहणारे आहेत.देशभरात निरीश्वरवादी म्हणून नोंद झालेल्यांपैकी सर्वाधिक ९,६५२ व्यक्ती महाराष्ट्रातील आहेत. त्यातही महिला (४,६०८) पुरुषांच्या (५,०४४) जवळजवळ बरोबरीत आहेत. महाराष्ट्रील निरीश्वरवाद्यांपैकी ७१ टक्के खेड्यांमध्ये राहणारे आहेत. शेजारच्या गोव्यात ४७ पुरुष व व १४ महिलांसह एकूण ६१ निरीश्वरवाद्यांची नोंद झाली आहे.जनगणना दर १० वर्षांनी केली जाते. प्रत्येक जनगणनेत माहिती घेताना हा प्रश्न विचारला जातो. अशा जनगणनेतून देशातील निरीश्वरवाद्यांचा आकडा समोर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधीच्या सन २००१च्या जनगणनेच्या अंतिम आकडेवारीत निरीश्वरवाद्यांचा कोणताही नेमका आकडा नमूद न करता फक्त ‘फारच थोड्या लोकांनी आपण निरीश्वरवादी असल्याची नोंद केली,’ असे मोघमपणे नमूद करण्यात आले होते.निरीश्वरवाद्यांमध्ये महाराष्ट्राच्या खालोखाल मेघालयचा (९,०८९) दुसरा क्रमांक लागतो. ईश्वर आणि धर्माचे पूर्णपणे वावडे असलेल्या कम्युनिस्ट विचारसरणीच्या सत्तेत दीर्घ काळ राहिलेल्या केरळ या राज्यात ४,८९६ निरीश्वरवादी नोंदले गेले. त्या तुलनेत पश्चिम बंगालमधील निरीश्वरवाद्यांची संख्या खूपच कमी म्हणजे ७८४ आहे. याखेरीज निरीश्वरवाद्यांची संख्या चार अंकी असलेल्या इतर राज्यांमध्ये उत्तर प्रदेश (२,४२५) व तमिळनाडू (१,२९७) यांचा समावेश आहे. मध्यंतरी सन २०१२मध्ये जगभरातील लोकांच्या धार्मिकतेचा मागोवा घेऊन एक जागतिक निर्देशांक काढण्यात आला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)आकडा जास्तही असू शकतो-जनगणनेत जी नोंद झाली तेवढेच निरीश्वरवादी भारतात असतील, असे खातरीने म्हणता येणार नाही. जनगणना विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, यापेक्षा कितीतरी जास्त लोकांनी (सुमारे २९ लाख-०.२४ टक्के) आपला धर्म सांगितला नाही किंवा धर्माची इतर गोष्टींशी गल्लत केली. -अशा लोकांची ‘धर्म सांगितला नाही’ या वर्गवारीत नोंद केली गेली. त्यामुळे ज्या निरीश्वरवाद्यांनी धर्म सांगितला नाही त्यांच्यापैकी काहींना या वर्गवारीत गणले गेले असू शकते. - शिवाय जनगणनेत कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडून माहिती न घेता एकाच वडीलधाऱ्या व्यक्तीकडून घरातील सर्वांची माहिती घेतली जाते. त्यामुळे कुटुंबातील तरुण पिढी धर्म व देव न मानणारी असली तरी कुटुंबप्रमुख सरकारी नोंदीत ते नोंदवून घेईलच, असे सांगता येत नाही.