शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

साथीच्या आजाराने दवाखाने हाऊसफुल!

By admin | Updated: August 9, 2014 22:43 IST

वातावरणातील बदलामुळे साथीच्या आजाराने डोके वर काढले असून मोठया प्रमाणात या आजाराचे रूग्ण उपचारासाठी दवाखान्यांमध्ये गर्दी करीत आहेत.

वाशिम : वातावरणातील बदलामुळे जिल्हयात साथीच्या आजाराने डोके वर काढले असून मोठया प्रमाणात या आजाराचे रूग्ण उपचारासाठी दवाखान्यांमध्ये गर्दी करीत आहेत. जिल्हा सामान्य रूग्णालयात विविध आजाराचे रूग्ण उपचाराकरिता गर्दी करीत असून नोंदणी करीता रांगा लागत आहेत. खासगी दवाखान्यातही मोठया प्रमाणात गर्दी आहे. वातावरणातील बदलामुळे साथीच्या आजारात वाढ होत असल्याने रूग्णालयात गर्दी वाढल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. सद्या पावसाळयाचे दिवस असून या दिवसात स्वच्छता पाळणे अतिशय आवश्यक आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयामध्ये दररोज शेकडो रूग्णांवर उपचार केल्या जात आहेत. यामध्ये सर्वात जास्त रूग्ण साथीचे आजाराचे दिसून येत आहेत. खोकला, डोकेदुखी, ताप, पोटावर व छातीवर सुज येणे या आजाराचे रूग्णांची संख्या मोठया प्रमाणात असल्याची माहिती जिल्हा सामान्य रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कावरखे यांनी दिली. ग्रामीण भागात पाणी पुरवठा करणार्‍या जलकुंभामध्ये ब्लिचिंग पावडरचा वापर करण्यात येत नसल्याने विविध आजाराचे रूग्ण वाढले आहेत. तसेच धुरफवारणी प्रकारचं जिल्हयात होत नसल्याने यामुळे अनेक आजार उदभवत आहेत. यामुळे मेंदुचा हिवताप, उलटया , नाक व तोंडातून रक्त येणे , त्वचेवर डाग पडणे रक्तादाब कमी होणे यासारखे आजार कमी प्रमाणात दिसूनयेत असले तरी यामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने ग्रामीण भागात धूरफवारणी करणे गरजेचे झाले आहे. तसेच आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी उघडयावरील तळलेले पदार्थ टाळावे, रेफ्रीजेटरमधील खाद्य पदार्थ टाळावे, हवेत प्रदूषणाचे प्रमाण जास्त असल्याने शक्यतो सकाळी घरीच थांबावे. अस्थमा असलेल्या रूग्णांनी विशेष काळजी या दिवसाची घेणे आवश्यक आहे. औषधोपचारांसह योगा व श्‍वसननाचा व्यायाम करावा आणि पाणी शुध्द करून जास्तीत जास्त पिण्याचा सल्ला आरोग्य विभागाच्यावतिने देण्यात आला आहे. शहरातील घाण पाण्यामध्ये एडीस, इजिप्टाय डासांची उत्पत्ती होत असून यापासून डेंगी ताप, मलेरीया, डायरिया, सर्दी , ताप, डोकदुखी, डेंगी, हिमोजिक फिवर, डेंगी शॉक, सिड्रोम या आजाराची लागण होवू शकते . याठिकाणी पालीका प्रशासनाकडून फाँगीग व फवारणी करण्यात येत नाही. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढत आहे. त्याकरीता नगरपरिषद प्रशासनाने लक्ष देवून नागरिकांच्या आरोग्याच्या काळजीबाबत लक्ष ठेवून सदर उपाय योजना करणे आवश्यक आहे. या दिवसात सर्वात जास्त आजाराचा त्रास लहान मुलांना सहन करावा लागत आहे. सद्या जिल्हा सामान्य रूग्णालयात येणार्‍या लहान मुलांना घशात खवखव होणे, डोळे खाजवणे तसेच कान व नाकाच्या आजारांसह सर्दी खोकला व तापाच्या आजारानी ग्रासले आहे. बालकांना श्‍वसनाचा अधिकच त्रास होत असल्याने जिल्हा सामान्य रूग्णालयांसह शहरातील बाल रूग्णालयामध्ये रूग्णांचीसंख्या वाढली आहे. ढगाळ वातावरण , रिमझिम पाऊस, पाऊसाची दडी दोन तीन दिवसानंतर जोराचा पाउस नंतर कडाक्याचे उन्ह व थंडी या वातावरणातील बदलामुळे जिल्हयात तापाच्या रूग्णांची संख्या वाढली आहे. खासगीसह जिल्हा सामान्य रूग्णालयात मोठया प्रामाणात गर्दी दिसत असून जिल्हयात सर्वाधिक रूग्ण साथीचे आजाराचे दिसत असल्याचे जिल्हा सामान्य रूग्णालयातील गर्दीवरून दिसून येत आहे.