शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

शेतकऱ्यांना खर्च कमी येणार, स्वस्त बियाणे जास्त उत्पन्न देणार; विशेष प्रकारचे बियाणे बाजारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 11:59 IST

भारतीय कृषी संशोधन परिषदेने विकसित केल्यात एकूण ६१ पिकांच्या जाती

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: अधिक उत्पन्न देणाऱ्या, बदलत्या हवामानास अधिक अनुकूल व  बायो-फोर्टिफाइड १०९ बियाणांचे वाण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशाला अर्पण केले. हे बियाणे कृषी आणि बागायती पिकांसाठी महत्त्वाचे आहे. या उपक्रमाचा उद्देश कृषी उत्पादकता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा आहे. या जाती भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) विकसित केल्या आहेत आणि त्या एकूण ६१ पिकांच्या आहेत. त्यापैकी ३४ शेतातील पिके आणि २७ बागायती पिके आहेत. पंतप्रधानांनी शेतकरी, शास्त्रज्ञांशी यावेळी संवादही साधला.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले की, शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे, कारण ६१ पिकांच्या १०९ जातींचे बियाणे जारी करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास, उत्पादनात वाढ आणि खर्च कमी होण्यास मदत होईल. ते म्हणाले की, या पिकांचे बियाणे हवामानास अनुकूल असून प्रतिकूल हवामानातही चांगले पीक देऊ शकतात. ते म्हणाले की, या जातींमध्ये भरपूर पोषकतत्त्वे आहेत.

‘जैव-फोर्टिफाइड’ वाणांवर भर

  • तृणधान्ये, बाजरी, चारा, तेलबिया, कडधान्ये, ऊस, कापूस आणि फायबर पिके यांचा लागवडीच्या पिकांमध्ये समावेश होतो. बागायती पिकांमध्ये फळे, भाज्या, मसाले, फुले आणि औषधी वनस्पतींच्या नवीन जातींचा समावेश होतो.
  • पंतप्रधानांनी ‘जैव-फोर्टिफाइड’ वाणांच्या संवर्धनावर सातत्याने भर दिला असून, कुपोषणाचा सामना करण्यासाठी माध्यान्ह भोजन योजना आणि अंगणवाडी सेवा यासारख्या सरकारी उपक्रमांशी जोडले आहे. 
  • ६१ पिकांशी संबंधित हे नवीन वाण कमी खर्चात उपलब्ध.
  • ६१ पिकांच्या १०९ जातींचे बियाणे बाजारात.
  • ३४ पिके, २७ बागायती पिकांचे नवे वाण.
  • २०१४ पासून  शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी सरकारचे प्रयत्न.

लोकांना हवे आहेत सेंद्रिय पदार्थ

  • मोदींनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले की, ६१ पिकांशी संबंधित हे नवीन वाण कमी खर्चात उपलब्ध होणार असल्याने अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
  • यावेळी पंतप्रधानांनी बाजरीच्या महत्त्वावर चर्चा केली आणि लोक पौष्टिक आहाराकडे कसे वाटचाल करत आहेत यावर भर दिला. 
  • नैसर्गिक शेतीचे फायदे आणि सेंद्रिय शेतीकडे सर्वसामान्यांची वाढती आवड याबद्दलही पंतप्रधानांनी सांगितले.
  • मोदी म्हणाले की, लोक सेंद्रिय पदार्थांकडे अधिक ओढले गेले असून, सेंद्रिय पदार्थांची मागणी अधिक वाढली आहे.
टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्र