शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

भारत-पाकिस्तान अणवस्त्र युद्धाची किंमत जगाला चुकवावी लागेल

By admin | Updated: September 29, 2016 19:50 IST

भारत-पाकिस्तानमध्ये अणवस्त्र युद्ध झाले तर, त्याचा परिणाम फक्त दोन्ही देशांवरच नाही तर, जगालाही भोगावा लागेल.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २९ - भारत-पाकिस्तानमध्ये अणवस्त्र युद्ध झाले तर, त्याचा परिणाम फक्त दोन्ही देशांवरच नाही तर, जगालाही भोगावा लागेल. भारताने गुरुवारी पाकव्याप्त काश्मिरमधील लष्करी तळांवर हल्ले करुन  उरी दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. त्यानंतर पुन्हा एकदा अणवस्त्र युद्धाची चर्चा सुरु झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर काय परिणाम होतील याचा घेतलेला आढावा. 
 
- भारत-पाकिस्तान दोन्ही देशांनी त्यांच्याकडे असलेल्या अणवस्त्रांपैकी निम्म्या १०० अणवस्त्रांचा जरी परस्परांविरुद्ध वापर केला तर एकाचवेळी दोन्ही देशांतील दोन कोटी १० लाख लोकांचा मृत्यू होईल. 
 
- अणवस्त्र वापरल्यामुळे पृथ्वीचे रक्षण करणारा निम्मा ओझोनचा थर नष्ट होईल.
 
- दोन्ही देशांकडे असलेला प्रत्येक अणूबॉम्ब जवळपास १५ किलो टन वजनाचा आहे. अमेरिकेने हिरोशिमावर १५ किलो टन वजनाचा अणूबॉम्ब टाकला होता. दोन्ही देशातील अणवस्त्र युद्धामुळे मान्सूनच्या पावसामध्ये बदल होऊन जगभरातील कृषी क्षेत्रावर परिणाम होईल. 
 
- अणवस्त्र हल्ल्यानंतर पहिल्या आठवडयातच भाजल्यामुळे, किरणोत्सारामुळे दोन्ही देशातील दोन कोटी १० लाख लोकांचा मृत्यू होईल. 
 
- मागच्या नऊ वर्षात दहशतवादी हल्ल्यात जितके भारतीय नागरीक आणि सुरक्षा जवान मारले गेले त्यापेक्षा २२२१ पट नागरीक एकाचवेळी मारले जातील. 
 
- उपखंडात झालेल्या अणवस्त्र वापरानंतर वातावरणातील बदलांमुळे जगभरातील दोन अब्ज लोकांना उपासमार आणि अन्य परिणाम भोगावे लागतील. 
 
- पाकिस्तानकडे सध्याच्या घडीला ११० ते १३० च्या आसपास अणवस्त्रे आहेत. भारताकडे असलेल्या अणवस्त्रांची संख्याही ११० ते १२० च्या घरात आहे. 
 
भारत-पाकिस्तानमध्ये अणवस्त्र युद्ध झाल्यास त्याचे काय परिणाम होतील यासंबंधी २००७ साली अमेरिकेतील तीन विद्यापीठांनी संशोधन करुन हे निष्कर्ष नोंदवले आहेत.