शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

भारत-पाकिस्तान अणवस्त्र युद्धाची किंमत जगाला चुकवावी लागेल

By admin | Updated: September 29, 2016 19:50 IST

भारत-पाकिस्तानमध्ये अणवस्त्र युद्ध झाले तर, त्याचा परिणाम फक्त दोन्ही देशांवरच नाही तर, जगालाही भोगावा लागेल.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २९ - भारत-पाकिस्तानमध्ये अणवस्त्र युद्ध झाले तर, त्याचा परिणाम फक्त दोन्ही देशांवरच नाही तर, जगालाही भोगावा लागेल. भारताने गुरुवारी पाकव्याप्त काश्मिरमधील लष्करी तळांवर हल्ले करुन  उरी दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. त्यानंतर पुन्हा एकदा अणवस्त्र युद्धाची चर्चा सुरु झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर काय परिणाम होतील याचा घेतलेला आढावा. 
 
- भारत-पाकिस्तान दोन्ही देशांनी त्यांच्याकडे असलेल्या अणवस्त्रांपैकी निम्म्या १०० अणवस्त्रांचा जरी परस्परांविरुद्ध वापर केला तर एकाचवेळी दोन्ही देशांतील दोन कोटी १० लाख लोकांचा मृत्यू होईल. 
 
- अणवस्त्र वापरल्यामुळे पृथ्वीचे रक्षण करणारा निम्मा ओझोनचा थर नष्ट होईल.
 
- दोन्ही देशांकडे असलेला प्रत्येक अणूबॉम्ब जवळपास १५ किलो टन वजनाचा आहे. अमेरिकेने हिरोशिमावर १५ किलो टन वजनाचा अणूबॉम्ब टाकला होता. दोन्ही देशातील अणवस्त्र युद्धामुळे मान्सूनच्या पावसामध्ये बदल होऊन जगभरातील कृषी क्षेत्रावर परिणाम होईल. 
 
- अणवस्त्र हल्ल्यानंतर पहिल्या आठवडयातच भाजल्यामुळे, किरणोत्सारामुळे दोन्ही देशातील दोन कोटी १० लाख लोकांचा मृत्यू होईल. 
 
- मागच्या नऊ वर्षात दहशतवादी हल्ल्यात जितके भारतीय नागरीक आणि सुरक्षा जवान मारले गेले त्यापेक्षा २२२१ पट नागरीक एकाचवेळी मारले जातील. 
 
- उपखंडात झालेल्या अणवस्त्र वापरानंतर वातावरणातील बदलांमुळे जगभरातील दोन अब्ज लोकांना उपासमार आणि अन्य परिणाम भोगावे लागतील. 
 
- पाकिस्तानकडे सध्याच्या घडीला ११० ते १३० च्या आसपास अणवस्त्रे आहेत. भारताकडे असलेल्या अणवस्त्रांची संख्याही ११० ते १२० च्या घरात आहे. 
 
भारत-पाकिस्तानमध्ये अणवस्त्र युद्ध झाल्यास त्याचे काय परिणाम होतील यासंबंधी २००७ साली अमेरिकेतील तीन विद्यापीठांनी संशोधन करुन हे निष्कर्ष नोंदवले आहेत.