शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक! कोरोनामुळे तब्बल 40 कोटी भारतीय लोटले जाणार गरिबीच्या खाईत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 13:50 IST

लॉकडाऊनमुळे देशातील बहुतांश व्यवहार उद्योगधंदे हे बंद आहेत. त्यामुळे त्याचा रोजगार आणि रोजंदारीवर विपरीत परिणाम झाला आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे देशातील बहुतांश व्यवहार उद्योगधंदे हे बंद असल्याने रोजगार आणि रोजंदारीवर विपरीत परिणाम कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या या संकटामुळे भारतातील 40 कोटी लोक गरिबीच्या खाईत लोटले जातील सध्याची परिस्थिती ही दुसऱ्या महायुद्धानंतर ओढवलेले सर्वात मोठे संकट

नवी दिल्ली - देशातील कोरोनाचे संक्रमण चिंताजनक पातळीपर्यंत वाढले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे देशातील बहुतांश व्यवहार उद्योगधंदे हे बंद आहेत. त्यामुळे त्याचा रोजगार आणि रोजंदारीवर विपरीत परिणाम झाला आहे. कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या या संकटामुळे भारतातील असंघटित क्षेत्रात काम करणारे सुमारे 40 कोटी लोक गरिबीच्या खाईत लोटले जातील अशी, भीती संयुक्त राष्ट्रांच्या कामगार विभागाने व्यक्त केली आहे. तसेच कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या परिस्थितीमुळे जगभरात सुमारे 19.5 कोटी लोकांच्या कायमस्वरूपी नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (आयएलओ) आपल्या 'आयएलओ निरीक्षण - दुसरी आवृत्ती कोविड-19 आणि जागतिक कामकाज' मध्ये सध्याची परिस्थिती ही दुसऱ्या महायुद्धानंतर ओढवलेले सर्वात मोठे संकट असल्याचे म्हटले आहे. आयएलओचे महासंचालक गाय रायडर यांनी सांगितले की, 'विकसित आणि विकसनशील अशा दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये कामगार आणि व्यावसायिकांना मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आपल्याला वेगाने, एकत्र आणि निर्णायक पावले उचलावी लागतील.'

'जगभरातील सुमारे दोन अब्ज लोक असंघटित क्षेत्रात काम करतात. यापैकी अनेक जण उगवत्या आणि विकासशील अर्थव्यवस्थामध्ये आहेत. हे एक गंभीर संकट आहे. कोविड-19 संकटाच्या आधीच असंघटित क्षेत्रातील लाखो कामगार प्रभावित झाले आहेत. आयएलओने सांगितले की भारत, नायजेरिया आणि ब्राझील या देशामध्ये लॉकडाऊन आणि अन्य उपाययोजनांमुळे असंघटित क्षेत्रातील श्रमिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.' असे या अहवालात म्हटले आहे. 

'भारतात अनौपचारिक अर्थव्यवस्थेमध्ये काम करणाऱ्यांची भागीदारी सुमारे 90 टक्के आहे. यामध्ये सुमारे 40 कोटी कामगारांसमोर गरिबीच्या खाईत लोटले जाण्याचे संकट आहे.'अशी भीती या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. तसेच भारतात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कामगार वर्ग मोठया प्रभावित झाला असून, यापैकी बहुतांश जणांना गावाकडे स्थलांतर करणे भाग पडले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतEconomyअर्थव्यवस्थाUnemploymentबेरोजगारी