शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

CoronaVirus News: ...तर कोरोना पुन्हा येणार, पुन्हा येणार, पुन्हा येणार; संयुक्त राष्ट्रांकडून धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 10:56 IST

CoronaVirus News: कोरोनाचा प्रादुर्भाव कायम; संयुक्त राष्ट्रानं संशोधनानंतर दिला धोक्याचा इशारा

मुंबई: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात ३५ हजार ८७१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यातले तब्बल २३ हजारांहून अधिक रुग्ण एकट्या महाराष्ट्रातले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे. अनेक भागांत पुन्हा निर्बंध लागू केले गेले आहेत. काही भागांत लॉकडाऊन करावा लागला आहे. एका बाजूला कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दुसऱ्या बाजूला लसीकरणाचा वेगदेखील वाढवला जात आहे. मात्र संयुक्त राष्ट्रांकडून (UN) दिलेल्या एका गंभीर इशाऱ्यानं सगळ्यांची चिंता वाढली आहे. विस्फोट! देशात कोरोना झपाट्याने वाढतोय, गेल्या 24 तासांत 35,871 नवे रुग्ण, 101 दिवसांनी झाली मोठी वाढकोरोना आता एका हंगामी आजाराच्या स्वरुपात विकसित होऊ शकतो, असा इशारा संयुक्त राष्ट्रांकडून देण्यात आला दिला आहे. 'कोरोना संकट पुढील काही महिने कायम राहिला, तर मग तो एका हंगामी आजाराच्या रुपात स्वत:ला विकसित करेल. चीनमध्ये कोरोना विषाणू आढळून आल्याच्या घटनेला वर्षभरापेक्षा अधिक कालावधी होऊन गेला आहे. या कालावधीत कोरोनाची लसदेखील आली. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे,' असं संयुक्त राष्ट्र संघटनेनं म्हटलं आहे.संकटं संपता संपेना! कोरोनापेक्षाही खतरनाक सुपरबगने शास्त्रज्ञांच्या चिंतेत भर; माजवू शकतो हाहाकारकोरोना विषाणूनं हंगामी आजाराचं स्वरुप धारण केल्यास बदलणाऱ्या मोसमात लोकांना त्याच्याशी दोन हात करावे लागतील, असा इशारा यूएननं दिला आहे. संघटनेच्या एका टीमनं कोरोनाचा प्रसार आणि त्यासाठी अनुकूल असणारं वातावरण यासंदर्भात अभ्यास केला. यातून कोरोना विषाणू एक हंगामी आजार म्हणून विकसित होऊ शकेल अशी माहिती समोर आली. श्वासाशी संबंधित विषाणूचा प्रादुर्भाव बहुतेकदा हंगामी असतो. अनुकूल वातावरणात असे आजार हातपाय पसरतात, असं निरीक्षण यूएनच्या १६ सदस्यीय टीमनं संशोधनानंतर नोंदवलं.देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भावगेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. मार्चमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. गेल्या २४ तासांत देशात ३५ हजार ८७१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर १७ हजार ७४१ जणांनी कोरोनावर मात केली. १७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा १ कोटी १४ लाख ७४ हजार ६०५ पोहोचला आहे. आतापर्यंत १ कोटी १० लाख ६३ हजार २५ जण कोरोनातून बरे झाले असून १ लाख ५९ हजार २१६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला देशात २ लाख ५२ हजार ३६४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ