शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

CoronaVirus: ...अन्यथा लॉकडाऊन ३० एप्रिललाच संपला असता; ३ कारणांमुळे वाढले ३ दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 14:55 IST

coronavirus ३ कारणांमुळे वाढले लॉकडाऊनचे ३ दिवस

नवी दिल्ली: कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची घोषणा केली. पंतप्रधान मोदी लॉकडाऊन वाढवतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात येईल, असा अंदाज अनेकांकडून वर्तवला जात होता. मात्र मोदींनी ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली. २४ मार्चला देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी तीन आठवड्यांचा लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे पुढचा लॉकडाऊन दोन किंवा तीन आठवड्यांचा असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. अन्यथा महिना संपेपर्यंत म्हणजेच ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवला जाईल, असं अनेकांना वाटतं होतं. मात्र मोदींनी लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. मोदींनी ३ मेची निवड का केली, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यामागे तीन महत्त्वाची कारणं असल्याचं सांगितलं जात आहे.सरकारमधील उच्चपदस्थ सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय केंद्रानं एकट्यानं घेतलेला नाही. राज्य सरकारांच्या शिफारशी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकार एप्रिलपर्यंतच लॉकडाऊनची घोषणा करणार होतं. मात्र १ मे रोजी जागतिक कामगार दिन आहे. त्यानंतर दोन आणि तीन तारखेला शनिवार, रविवार आहेत. म्हणूनच राज्यांनी लॉकडाऊन तीन दिवस वाढवण्याची शिफारस केली.तीन दिवस लॉकडाऊन वाढवून असा कोणता फायदा होणार, असा प्रश्नदेखील काही जण उपस्थित करत आहेत. ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला असता, तर सध्याच्या लॉकडाऊनमध्ये १६ दिवसांची भर पडली असती. मात्र ३ मेपर्यंत लॉकडाऊन घोषित झाल्यानं आता १९ दिवसांनी लॉकडाऊन वाढला आहे. कोरोनाची लक्षणं दिसण्यासाठी ७ ते १४ दिवसांचा अवधी लागतो. लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आल्यानं कोरोनाची लक्षणं आढळून येण्यास तीन दिवस जास्त मिळतील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी