शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

coronavirus : कधी आणि कसं हटवायचं लॉकडाऊन? फिक्कीने सरकारला दिला हा सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 16:01 IST

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लागू केलेल्या लॉकडाऊनची मुदत 14 एप्रिल रोजी संपत आहे. त्यामुळे देशातील लॉकडाऊन सुरू राहील की हटवण्यात येईल? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे.

ठळक मुद्देदेशातील लॉकडाऊन हळूहळू हटवण्यात यावे, तसेच आयटी कंपन्या आणि शाळा सद्यस्थितीत बंद ठेवाव्यात कोरोनामुक्त जिल्ह्यांपासून लॉकडाऊन हटवण्याची सुरुवात करण्यात यावीरस्ते वाहतुकीला नियमांनुसार परवानगी देण्यात यावी. त्याबरोबरच रेल्वेसेवासुद्धा मर्यादित स्वरूपात सुरू करावी

मुंबई - एकीकडे देशातील कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लागू केलेल्या लॉकडाऊनची मुदत 14 एप्रिल रोजी संपत आहे. त्यामुळे देशातील लॉकडाऊन सुरू राहील की हटवण्यात येईल? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर फिक्कीने देशातील लॉकडाऊन कधी आणि कशाप्रकारे हटवण्यात यावे याबाबत सरकारला महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे.

फिक्की म्हणजेच फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ही भारतातील उद्योग आणि व्यवसायांचे हितसंबंध जपणारी संस्था आहे. देशातील लॉकडाऊन हळूहळू हटवण्यात यावे, तसेच आयटी कंपन्या आणि शाळा सद्यस्थितीत बंद ठेवाव्यात असे फिक्कीने म्हटले आहे. कामगारांना 15 एप्रिलपासून कामावर बोलावण्यात यावे. तसेच त्यांना कामावर येण्यासाठी प्रोत्साहित करावे. कोरोनामुक्त जिल्ह्यांपासून लॉकडाऊन हटवण्याची सुरुवात करण्यात यावी. रिटेल स्टोअर्सना अंशतः उघडण्याची परवानगी देण्यात यावी. तसेच ई-कॉमर्स कंपन्या आणि देशांतर्गत उड्डाणांना अंशतः परवानगी देण्यात यावी. 

रस्ते वाहतुकीला नियमांनुसार परवानगी देण्यात यावी. त्याबरोबरच रेल्वेसेवासुद्धा मर्यादित स्वरूपात सुरू करावी, असा प्रस्ताव फिक्कीने दिला आहे. मात्र शाळा आणि आयटीप्रमाणेच देशातील छोट्या आणि मोठ्या हॉटेलमध्ये लॉकडाऊन सुरू ठेवावे, असेही फिक्कीने म्हटले आहे. 

संपूर्ण देशात मालवाहतुकीस परवानगी मिळाली पाहिजे. तसेच अत्यावश्यक साधनांच्या वाहतुकीसाठी लष्कराची मदत घेण्यात यावी. कोरोनामुक्त जिल्ह्यांत उत्पादन आणि वितरण सुरू व्हावे, सुरुवातीच्या काळात 22 ते 39 या वयोगटातील सुदृढ लोकांनी काम करावे. तसेच आजारी आणि ज्येष्ठ यांना सुदृढ कर्मचाऱ्यांपासून दूर ठेवावे. 

कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधा वाढवाव्यात. त्याबरोबरच कोरोना प्रभावित भागांना उच्च, मध्यम आणि कमी धोका असलेल्या भागांमध्ये विभाजित करण्यात यावे. मास्कचे मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि वितरण व्हावे आणि संशयित व्यक्तींची कोरोना चाचणी व्हावी, अशी शिफारस फिक्कीने केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसायGovernmentसरकार