शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोना लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदींची सर्वात मोठी चूक कोणती?; राहुल गांधी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 17:39 IST

सध्या देशात आपत्कालीन परिस्थिती आहे. यावेळी मजबूत रणनीती बनवून या संकटाचा सामना केला पाहिजे

नवी दिल्ली – देशात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने ३ मे पर्यंत देशभरात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी झूम व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. देशात टेस्टिंग किट्स वाढवण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितले.

यावेळी राहुल गांधी म्हणाले की, सध्या देशात आपत्कालीन परिस्थिती आहे. यावेळी मजबूत रणनीती बनवून या संकटाचा सामना केला पाहिजे असं त्यांनी सांगितले. राहुल गांधी वारंवार कोरोनावर ट्विट करत होते. त्यामुळे पत्रकारांनी राहुल यांना प्रश्न विचारला की, कोरोना व्हायरसच्या लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात मोठी चूक काय केली? लॉकडाऊनचं प्लॅनिंग करण्यात पंतप्रधान कमी पडले का? असं विचारण्यात आलं.

पत्रकाराच्या या प्रश्नाचं उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, मी याचं उत्तर त्यादिवशी सांगेल जेव्हा भारत कोरोनाला हरवेल. आज मी फक्त काही सल्ला देऊ शकतो. आरोप-प्रत्यारोपाच्या भानगडीत मला पडायचे नाही. असं त्यांनी सागंतिले. तसेच विरोधी पक्ष सरकारला सल्ले देत आहे. तुम्ही स्वत: अनेकदा काही सूचना केल्या आहेत. पण केंद्र सरकार तुमच्या सूचना ऐकत नाही, काँग्रेसला क्रेडिट दिलं जाईल असं त्यांना वाटतं का? असा प्रश्न विचारला असता राहुल गांधी म्हणाले की, मला कोणतंही श्रेय नको, फक्त देशातील जनता सुरक्षित राहायला हवी. आम्हाला श्रेयवादाशी देणंघेणं नाही. ज्यांना श्रेय लाटायचे आहे त्यांनी घेऊद्या. आमचं काम रचनात्मक पर्याय सूचवणे आहे ते घ्यावे की नाही हा सरकारचा निर्णय आहे असं राहुल गांधींनी सांगितले.

दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव उपाय नसल्याचेही राहुल गांधींनी सांगितले. ते म्हणाले की, 'कोरोना विषाणूच्या फैलावामुळे देशात आज गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र केवळ लॉकडाऊन हा कोरोनाला रोखण्याचा एकमेव उपाय नाही. लॉकडाऊनमुळे कोरोना केवळ थांबून राहील. संपणार नाही. लॉकडाऊन हटवल्यानंतर कोरोना पुन्हा पसरेल. त्यामुळे कोरोनाला रोखायचे असेल तर कोरोना संशयितांच्या अधिकाधिक चाचण्या घेणे हाच उपाय आहे. त्यामुळे सरकारने या चाचण्या घेतल्या पाहिजेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी