शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोना लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदींची सर्वात मोठी चूक कोणती?; राहुल गांधी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 17:39 IST

सध्या देशात आपत्कालीन परिस्थिती आहे. यावेळी मजबूत रणनीती बनवून या संकटाचा सामना केला पाहिजे

नवी दिल्ली – देशात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने ३ मे पर्यंत देशभरात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी झूम व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. देशात टेस्टिंग किट्स वाढवण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितले.

यावेळी राहुल गांधी म्हणाले की, सध्या देशात आपत्कालीन परिस्थिती आहे. यावेळी मजबूत रणनीती बनवून या संकटाचा सामना केला पाहिजे असं त्यांनी सांगितले. राहुल गांधी वारंवार कोरोनावर ट्विट करत होते. त्यामुळे पत्रकारांनी राहुल यांना प्रश्न विचारला की, कोरोना व्हायरसच्या लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात मोठी चूक काय केली? लॉकडाऊनचं प्लॅनिंग करण्यात पंतप्रधान कमी पडले का? असं विचारण्यात आलं.

पत्रकाराच्या या प्रश्नाचं उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, मी याचं उत्तर त्यादिवशी सांगेल जेव्हा भारत कोरोनाला हरवेल. आज मी फक्त काही सल्ला देऊ शकतो. आरोप-प्रत्यारोपाच्या भानगडीत मला पडायचे नाही. असं त्यांनी सागंतिले. तसेच विरोधी पक्ष सरकारला सल्ले देत आहे. तुम्ही स्वत: अनेकदा काही सूचना केल्या आहेत. पण केंद्र सरकार तुमच्या सूचना ऐकत नाही, काँग्रेसला क्रेडिट दिलं जाईल असं त्यांना वाटतं का? असा प्रश्न विचारला असता राहुल गांधी म्हणाले की, मला कोणतंही श्रेय नको, फक्त देशातील जनता सुरक्षित राहायला हवी. आम्हाला श्रेयवादाशी देणंघेणं नाही. ज्यांना श्रेय लाटायचे आहे त्यांनी घेऊद्या. आमचं काम रचनात्मक पर्याय सूचवणे आहे ते घ्यावे की नाही हा सरकारचा निर्णय आहे असं राहुल गांधींनी सांगितले.

दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव उपाय नसल्याचेही राहुल गांधींनी सांगितले. ते म्हणाले की, 'कोरोना विषाणूच्या फैलावामुळे देशात आज गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र केवळ लॉकडाऊन हा कोरोनाला रोखण्याचा एकमेव उपाय नाही. लॉकडाऊनमुळे कोरोना केवळ थांबून राहील. संपणार नाही. लॉकडाऊन हटवल्यानंतर कोरोना पुन्हा पसरेल. त्यामुळे कोरोनाला रोखायचे असेल तर कोरोना संशयितांच्या अधिकाधिक चाचण्या घेणे हाच उपाय आहे. त्यामुळे सरकारने या चाचण्या घेतल्या पाहिजेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी