शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
2
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
3
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
4
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
5
प्लेन रनवेवर टेकऑफसाठी सुसाट धावलं, पण अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं आणि...; व्हिडीओ व्हायरल
6
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
7
Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS संस्कृती जैन यांना सोनेरी पालखीतून अनोखा निरोप, पाणावले डोळे
8
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
9
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
10
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
11
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
12
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
13
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
14
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
15
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
16
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
17
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
18
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
19
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
20
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी

Coronavirus: कोरोना लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदींची सर्वात मोठी चूक कोणती?; राहुल गांधी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 17:39 IST

सध्या देशात आपत्कालीन परिस्थिती आहे. यावेळी मजबूत रणनीती बनवून या संकटाचा सामना केला पाहिजे

नवी दिल्ली – देशात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने ३ मे पर्यंत देशभरात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी झूम व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. देशात टेस्टिंग किट्स वाढवण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितले.

यावेळी राहुल गांधी म्हणाले की, सध्या देशात आपत्कालीन परिस्थिती आहे. यावेळी मजबूत रणनीती बनवून या संकटाचा सामना केला पाहिजे असं त्यांनी सांगितले. राहुल गांधी वारंवार कोरोनावर ट्विट करत होते. त्यामुळे पत्रकारांनी राहुल यांना प्रश्न विचारला की, कोरोना व्हायरसच्या लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात मोठी चूक काय केली? लॉकडाऊनचं प्लॅनिंग करण्यात पंतप्रधान कमी पडले का? असं विचारण्यात आलं.

पत्रकाराच्या या प्रश्नाचं उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, मी याचं उत्तर त्यादिवशी सांगेल जेव्हा भारत कोरोनाला हरवेल. आज मी फक्त काही सल्ला देऊ शकतो. आरोप-प्रत्यारोपाच्या भानगडीत मला पडायचे नाही. असं त्यांनी सागंतिले. तसेच विरोधी पक्ष सरकारला सल्ले देत आहे. तुम्ही स्वत: अनेकदा काही सूचना केल्या आहेत. पण केंद्र सरकार तुमच्या सूचना ऐकत नाही, काँग्रेसला क्रेडिट दिलं जाईल असं त्यांना वाटतं का? असा प्रश्न विचारला असता राहुल गांधी म्हणाले की, मला कोणतंही श्रेय नको, फक्त देशातील जनता सुरक्षित राहायला हवी. आम्हाला श्रेयवादाशी देणंघेणं नाही. ज्यांना श्रेय लाटायचे आहे त्यांनी घेऊद्या. आमचं काम रचनात्मक पर्याय सूचवणे आहे ते घ्यावे की नाही हा सरकारचा निर्णय आहे असं राहुल गांधींनी सांगितले.

दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव उपाय नसल्याचेही राहुल गांधींनी सांगितले. ते म्हणाले की, 'कोरोना विषाणूच्या फैलावामुळे देशात आज गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र केवळ लॉकडाऊन हा कोरोनाला रोखण्याचा एकमेव उपाय नाही. लॉकडाऊनमुळे कोरोना केवळ थांबून राहील. संपणार नाही. लॉकडाऊन हटवल्यानंतर कोरोना पुन्हा पसरेल. त्यामुळे कोरोनाला रोखायचे असेल तर कोरोना संशयितांच्या अधिकाधिक चाचण्या घेणे हाच उपाय आहे. त्यामुळे सरकारने या चाचण्या घेतल्या पाहिजेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी