शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

कोरोनाचा वेग वाढतोय! देशात 79 टक्क्यांनी वाढला संसर्ग, 'या' राज्यांमध्ये धोक्याची घंटा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 09:30 IST

गेल्या आठवड्यात म्हणजेच रविवारपर्यंत देशात 36 हजारांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. 

नवी दिल्ली : देशात मागील काही दिवसांपासून कोरोना व्हायरस पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. शहर, उपनगरातील दैनंदिन कोरोना रुग्णांसह सक्रिय रुग्णांची संख्या वाढत आहे. दररोज 5 हजारांहून अधिक नवीन कोरोना प्रकरणांची नोंद होत आहे. तसेच, देशात पॉझिटिव्हिटी रेट सुद्धा वाढला आहे. गेल्या आठवड्यात म्हणजेच रविवारपर्यंत देशात 36 हजारांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. 

कोरोना प्रकरणांमध्ये 79 टक्क्यांनी वाढ झाली आहे, जी जवळपास सात महिन्यांतील सर्वाधिक आहे. कारण गेल्या आठवड्यापर्यंत ज्या राज्यांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी रुग्ण होते, त्या राज्यांमध्येही आता रुग्णांची संख्या वाढत आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, 3 एप्रिल ते 9 एप्रिलपर्यंत भारतात कोरोनामुळे 68 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याआधीच्या आठवड्यात 41 जणांचा मृत्यू झाला होता. तर केरळमध्ये सर्वाधिक 11,296 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत, जी मागील आठवड्यापेक्षा 2.4 पट जास्त आहे. यानंतर महाराष्ट्रात 4,587, दिल्लीत 3,896, हरियाणामध्ये 2,140 आणि गुजरातमध्ये 2,039 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. 

चिंताजनक बाब म्हणजे, ज्या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये आत्तापर्यंत प्रकरणे तुलनेने कमी होती, तेथे ही संख्या झपाट्याने वाढली. यामध्ये राजस्थान, जिथे आठवड्याच्या अखेरीस कोरोनाचे 631 रुग्ण आढळले. तर यापूर्वी 194 प्रकरणे होती. दुसरीकडे, छत्तीसगडमध्ये 113 ते 462, ओडिशात 193 ते 597 आणि जम्मू-काश्मीरमध्ये 129 ते 413, इतर राज्यांचाही समावेश आहे. भारतात 3 एप्रिल ते 9 एप्रिल दरम्यान कोरोनाची 36,250 नवीन प्रकरणे नोंदवली गेली, तर मागील आठवड्यात 20,293 प्रकरणे होती. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांचा हा सलग आठवा आठवडा होता.

राजस्थानमध्ये सोमवारी कोरोना व्हायरसची लागण झालेल्या आणखी तीन जणांचा मृत्यू झाला असून संसर्गाची 197 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. सोमवारी महाराष्ट्रात कोरोनाच्या संसर्गाचे 328 नवीन रुग्ण आढळून आले. या संख्येत आदल्या दिवसाच्या तुलनेत ५० टक्क्यांहून अधिक घट झाली असून त्यामुळे राज्यातील एकूण संक्रमितांची संख्या 81,50,257 वर पोहोचली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे.

मुंबईत सहा हजारांहून अधिक जण गृहविलगीकरणातशहर, उपनगरातील दैनंदिन कोरोना रुग्णांसह सक्रिय रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या शहर, उपनगरात 6 हजार 988 नागरिक गृहविलगीकरणात असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. याखेरीज, शहरातील 1 हजार 367 सक्रिय रुग्णांपैकी 92 टक्के रुग्ण लक्षणविरहित असल्याचे निरीक्षण आहे. सध्या मुंबईतील पाच कोरोना रुग्णांची स्थिती गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुंबईत 1 हजार 148 रुग्ण लक्षणविरहित आहेत, तर केवळ 91 रुग्णांमध्ये सौम्य, तीव्र आणि मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत. तसेच, शहर, उपनगरात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट सध्या 6.16 टक्के आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस