शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

Coronavirus Updates in India: देशात वाढतायेत मृत्यूचे आकडे; गेल्या २४ तासांत ४,२०९ रुग्ण दगावले, आरोग्य विभाग चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 06:16 IST

आरोग्य मंत्रालयाने केली चिंता व्यक्त : योग्य नियोजन करण्याच्या रुग्णालयांना सूचना

विकास झाडे

नवी दिल्ली : कोरोना रुग्णाच्या मृत्यूच्या आकडेवारीने पुन्हा एकदा चार हजारांचा टप्पा गाठला आहे. मृत्यूची संख्या कमी होणे आणि पुन्हा चार हजारांवर जाणे असे कित्येक दिवस सुरू आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत चिंता व्यक्त केली असून रुग्णांच्या शुश्रूषाचे योग्य नियोजन करा, अशा सूचना देशभरातील रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत.

गेल्या २४ तासांमध्ये देशभरात ४ हजार २०९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे भारताचा कोरोना मृत्यूदर १.११ वरून १.१२ टक्क्यांवर गेला आहे. महाराष्ट्रात ७३८ रुग्णांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक ५४८, तामिळनाडू ३९७ तसेच दिल्लीत २५२ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. देशभरातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या आता कमी होत आहे. मात्र, मृत्यूच्या नोंदी वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आरोग्य मंत्रालयाने कोरोना मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे निर्देश राज्य, केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. दिल्लीत गेल्या २४ तासांमध्ये ३००९ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. रुग्णांचा पॉझिटिव्हिटी दर ४.७६ टक्क्यांवर आला आहे. गुरुवारी हा दार ५.५० टक्के होता. 

गेल्या २४ तासांमध्ये २ लाख ५९ हजार ५५१ नवीन कोरोनाबाधितांची भर पडली. तर ३ लाख ५७ हजार २९५ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ कोटी ६० लाख ३१ हजार ९९१ झाली आहे. यातील २ कोटी २७ लाख १२ हजार ७३५ रुग्ण हे कोरोना मुक्त झाले आहेत. ३० लाख २७ हजार ९२५ रुग्णांवर (११.६३%) उपचार सुरू आहेत. देशात आतापर्यंत २ लाख ९१ हजार ३३१ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. शुक्रवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ८७.२५ टक्क्यांवर पोहोचला. गेल्या एका दिवसात सक्रिय कोरोना रुग्णसंख्येत १ लाख १ हजार ९५३ ने घट नोंदवण्यात आली आहे.

गेल्या २४ तासांतील एकूण कोरोनाबाधितांपैकी ७७ टक्के रुग्ण १० राज्यांत आढळले. त्यात तामिळनाडूत सर्वाधिक ३५ हजार ५७९ रुग्णांची भर पडली. केरळ ३०,४९१, महाराष्ट्र २९,९११, कर्नाटक २८,८६९, आंध्र प्रदेश २२,६१०, प. बंगाल १९,०९१, ओडिशा ११,४९८, राजस्थान ७,६८०, उ. प्रदेश ६,६८१ तसेच आसाममध्ये ६ हजार ५७३ रुग्ण नोंदविण्यात आलेत.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या१) कर्नाटक -  ५,३४,९७५२) महाराष्ट्र  -  ३,८५,७८५३) केरळ   - ३,१८,२२०४) तामिळनाडू - २,६३,३९०५) आंध्र प्रदेश  - २,०९,१३४६) राजस्थान -१,४३,९७४७) प. बंगाल - १,३१,५१०८) उ. प्रदेश - १,१६,४३४

लसीकरण! देशात आतापर्यंत १९ कोटी १८ लाख ७९ हजार ५०३ लसीचे डोस लावण्यात आले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये १४ लाख ८२ हजार ७५४ लोकांचे लसीकरण झाले. आतापर्यंत एकूण ३२ कोटी ४४ लाख १७ हजार ८७० तपासण्या करण्यात आल्या आहेत.यातील २० लाख ६१ हजार ६८३ तपासण्या २४ तासात करण्यात आल्यात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या