शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

'रहस्यमय ताप' ठरतोय तापदायक; एका गावात एकाच महिन्यात १०० हून अधिक दगावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 09:10 IST

गावात दररोज १-२ जणांचा मृत्यू; जिल्हा रुग्णालयातही उपचार मिळेनात; ग्रामस्थ चिंतेत

फतेहपूर: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाही. कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून घट झालेली आहे. मात्र अजूनही दररोज देशात २ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. त्यातच उत्तर प्रदेशातील एका जिल्ह्यात वेगळाच धोका निर्माण झाला आहे. देशातील सर्वात मागास जिल्ह्यांपैकी एक असलेल्या फतेहपूरमध्ये 'रहस्यमय ताप' डोकेदुखी ठरत आहे. यमुनेच्या किनाऱ्यावर असलेल्या ललौली गावात गेल्या महिन्याभरात यामुळे १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.मोठी बातमी! मेड इन इंडिया लस कोवॅक्सिनला धक्का; सीरमच्या कोविशील्डला दिलासारहस्यमय तापामुळे दगावलेल्या १०० पेक्षा अधिक जणांना गावातील १० कब्रस्तानांमध्ये दफन करण्यात आलं. ताप आणि श्वास फुलल्यामुळे ग्रामस्थांचा मृत्यू होत असल्यानं स्थानिकांनी सांगितलं. यापैकी कोणालाही उपचार मिळाले नाहीत. २३ एप्रिलला गावात सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली. या दिवशी ७ जणांचा रहस्यमय तापामुळे मृत्यू झाला. देशात वाढतायेत मृत्यूचे आकडे; गेल्या २४ तासांत ४,२०९ रुग्ण दगावले, आरोग्य विभाग चिंतेतफतेहपूर जिल्ह्यात २६ एप्रिलला पंचायत निवडणुकीचं मतदान पार पडलं. जिल्ह्यातल्या इतर भागांतही प्रचारासोबत प्रादुर्भावदेखील वाढत होता. जिल्हा मुख्यालयापासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या बांदा हायवेच्या कडेला असलेल्या ललौली गावातील अनेकांना थंडी, ताप आणि श्वासोच्छवासात अडचणी जाणवू लागल्या.गावचे नवनिर्वाचित सरपंच शमीम अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार, १० एप्रिलला पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला. थंडी ताप वाढल्यानं संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला असावा असं मानून ग्रामस्थांनी याकडे दुर्लक्ष केलं. मात्र त्यानंतर रुग्णांची संख्या वाढू लागली. त्यानंतर दर दिवशी याच लक्षणांसह १-२ जणांचा मृत्यू होऊ लागला.रुग्णांना घेऊन स्थानिकांनी फतेहपूर जिल्हा रुग्णालय गाठलं. मात्र तिथे त्यांना दाखल करून घेण्यात आलं नाही. कानपूर आणि बांदा रुग्णालयांमध्येही उपचार मिळाले नाहीत. काही निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीनं ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था करण्यात आली. मात्र ती अपुरी ठरली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या