शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

'रहस्यमय ताप' ठरतोय तापदायक; एका गावात एकाच महिन्यात १०० हून अधिक दगावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 09:10 IST

गावात दररोज १-२ जणांचा मृत्यू; जिल्हा रुग्णालयातही उपचार मिळेनात; ग्रामस्थ चिंतेत

फतेहपूर: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाही. कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून घट झालेली आहे. मात्र अजूनही दररोज देशात २ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. त्यातच उत्तर प्रदेशातील एका जिल्ह्यात वेगळाच धोका निर्माण झाला आहे. देशातील सर्वात मागास जिल्ह्यांपैकी एक असलेल्या फतेहपूरमध्ये 'रहस्यमय ताप' डोकेदुखी ठरत आहे. यमुनेच्या किनाऱ्यावर असलेल्या ललौली गावात गेल्या महिन्याभरात यामुळे १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.मोठी बातमी! मेड इन इंडिया लस कोवॅक्सिनला धक्का; सीरमच्या कोविशील्डला दिलासारहस्यमय तापामुळे दगावलेल्या १०० पेक्षा अधिक जणांना गावातील १० कब्रस्तानांमध्ये दफन करण्यात आलं. ताप आणि श्वास फुलल्यामुळे ग्रामस्थांचा मृत्यू होत असल्यानं स्थानिकांनी सांगितलं. यापैकी कोणालाही उपचार मिळाले नाहीत. २३ एप्रिलला गावात सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली. या दिवशी ७ जणांचा रहस्यमय तापामुळे मृत्यू झाला. देशात वाढतायेत मृत्यूचे आकडे; गेल्या २४ तासांत ४,२०९ रुग्ण दगावले, आरोग्य विभाग चिंतेतफतेहपूर जिल्ह्यात २६ एप्रिलला पंचायत निवडणुकीचं मतदान पार पडलं. जिल्ह्यातल्या इतर भागांतही प्रचारासोबत प्रादुर्भावदेखील वाढत होता. जिल्हा मुख्यालयापासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या बांदा हायवेच्या कडेला असलेल्या ललौली गावातील अनेकांना थंडी, ताप आणि श्वासोच्छवासात अडचणी जाणवू लागल्या.गावचे नवनिर्वाचित सरपंच शमीम अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार, १० एप्रिलला पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला. थंडी ताप वाढल्यानं संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला असावा असं मानून ग्रामस्थांनी याकडे दुर्लक्ष केलं. मात्र त्यानंतर रुग्णांची संख्या वाढू लागली. त्यानंतर दर दिवशी याच लक्षणांसह १-२ जणांचा मृत्यू होऊ लागला.रुग्णांना घेऊन स्थानिकांनी फतेहपूर जिल्हा रुग्णालय गाठलं. मात्र तिथे त्यांना दाखल करून घेण्यात आलं नाही. कानपूर आणि बांदा रुग्णालयांमध्येही उपचार मिळाले नाहीत. काही निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीनं ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था करण्यात आली. मात्र ती अपुरी ठरली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या