शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

Coronavirus: दाहकता! गर्दीमुळं टोकन घेऊन मृतदेहांवर अंत्यसंस्कार; मध्यरात्रीपर्यंत पाहावी लागतेय वाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 12:26 IST

कर्नाटकच्या होसापल्यामध्ये अंत्यसंस्कारासाठी टोकन घेऊन वाट पाहावी लागत आहे. दिवसभर रांगेत वाट पाहून मध्यरात्री अंत्यसंस्कार केले जात आहेत.

बंगळुरू – देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे तर मृतांचा आकडाही वाढत आहे. गुजरातपाठोपाठ कर्नाटकमधूनही एक ह्दयद्रावक घटना समोर येत आहे. कोरोना संक्रमणामुळं मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणात स्मशानभूमी बाहेर रांगा लावल्या जात असल्याचं दिसून येत आहे. इतकचं नाही तर याठिकाणी होणारी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी आता टोकन पद्धत सुरू करण्यात आली आहे.

कर्नाटकच्या होसापल्यामध्ये अंत्यसंस्कारासाठी टोकन घेऊन वाट पाहावी लागत आहे. दिवसभर रांगेत वाट पाहून मध्यरात्री अंत्यसंस्कार केले जात आहेत. मृतदेहांना घेऊन नातेवाईक टोकनमध्ये वाट पाहत आहेत. सोमवारी संध्याकाळपर्यंत १४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याशिवाय ६ रुग्णवाहिकेतील मृतदेह अंत्यसंस्कारासाठी रांगेत होते. स्मशानभूमीतील एका कर्मचाऱ्याने सांगितले की, याठिकाणी मृतदेह जाळण्यासाठी दोन चिता आहेत. सोमवारी ३१ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मंगळवारी सकाळी ५ पर्यंत मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात होते. चंद्रकुमार सांगतात की, ऑक्टोबर २०२० पर्यंत याठिकाणी कोरोनाचे १ किंवा २ मृतदेह दिवसभरात येत होते. परंतु मागील काही दिवसांपासून याठिकाणी मृतदेहांची संख्या वाढली. त्यासाठी आता टोकन पद्धत सुरू केली आहे. बंगळुरूमध्ये कोरोनाची दुसरी लाटेने मोठ्या प्रमाणात थैमान घातलं आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. हॉस्पिटलमध्ये अचानक वाढणाऱ्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. १९ एप्रिलला राज्यात ९७ लोकांचा मृत्यू झाला आहे.  

भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या१,५६,१६,१३० वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. बुधवारी (२१ एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत२,९५,०४१ नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दीड कोटीवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा एक लाख ८२ हजारांवर पोहोचला आहे. याच दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लसीकरण आणि कोरोना रुग्णांबाबत माहिती दिली आहे. देशात आतापर्यंत १२,७१, ००,०००  हून अधिक जणांना कोरोनावरील लस दिली गेली आहे. मृत्यू दरही १.१८ टक्के इतका कमी झाला आहे.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या