शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

CoronaVirus: देशाच्या राजधानीतच 'लॉकडाऊन'ची ऐशीतैशी; बस स्टँडवर हजारोंची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 22:51 IST

रोजगारच नसल्यानं हजारो लोक घरी जाण्याच्या प्रयत्नात

नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. आपल्या घरातच राहा, असं आवाहन मोदींनी देशवासीयांना केलं. मात्र लॉकडाऊनमुळे रोजागरच नसल्यानं कित्येक जण शहरांमधून गावांकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. दिल्लीत आज बस स्टँडवर हजारोंनी गर्दी केली होती. रोजगार नसल्यानं पोट भरायचं कसं, या विवंचनेत असलेले वाहतूक पूर्णपणे ठप्प असतानाही त्यांच्या गावी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी २४ मार्चला लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊनच्या २१ दिवसांमध्ये घराबाहेर पडू नका, असं आवाहन मोदींनी केलं. मात्र लॉकडाऊनच्या घोषणेमुळे उत्तर प्रदेश, बिहारमधून आलेल्या हजारो स्थलांतरितांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. हातावरचं पोट असल्यानं जगायचं कसं, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाल्यानं ते त्यांच्या गावी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे दिल्लीतल्या अनेक बस आगारांमध्ये आज हजारोंची गर्दी पाहायला मिळाली. उपजीविकेसाठी दिल्लीला आलेली हजारो कुटुंब उत्तर प्रदेशातल्या त्यांच्या गावांकडे परतण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा हजारो कुटुंबांनी आज दिल्लीतल्या बस स्टँडवर गर्दी केली. गेल्या काही दिवसांपासून शहरातल्या अनेक स्टँडवर अशीच परिस्थिती पाहायला मिळत होती. अखेर आज दिल्ली आणि उत्तर प्रदेश सरकारनं त्यांच्यासाठी काही बसेसची सोय केली. उत्तर प्रदेश सरकारनं राज्यातील नागरिकांना परत आणण्यासाठी १ हजार बसेसची व्यवस्था केली. तर दिल्ली सरकारनं डीटीसीच्या २०० बसेस उपलब्ध करुन दिल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या