शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

CoronaVirus News: दुसऱ्या लाटेनंतर कोरोनाची लक्षणं बदलली; 'या' रुग्णांमुळे डॉक्टरांची चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 20:26 IST

CoronaVirus News: दुसऱ्या लाटेनंतर कोरोनाच्या लक्षणांमध्ये बदल; डॉक्टरांची चिंता वाढली

कोलकाता: सध्या देशातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. एप्रिल-मेमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली. मेच्या पहिल्या आठवड्यात देशात दररोज ४ लाखांहून अधिक रुग्ण सापडत होते. मात्र आता कोरोनाची लक्षणं बदलली आहेत. त्यामुळे कोरोना संक्रमण ओळखण्याचं आव्हान निर्माण झालं आहे. कोरोना चाचणी करून घेण्याचा सल्ला अनेक जण गांभीर्यानं घेत नाहीत, असा कोलकात्यामधील डॉक्टरांचा अनुभव आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे. त्यामुळे आता कोरोना होणारच नाही, असा अनेकांचा समज झाला आहे. आता कोरोनाची लक्षणं बदलली आहेत. ती सौम्य स्वरुपाची आहेत. मात्र उपचार न घेतल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. 'अनेकजण आता कोरोना चाचणी करून घेण्यास रस दाखवत नाहीत. डॉक्टरांच्या सल्ल्यांकडे बरेचजण दुर्लक्ष करतात. कोरोना चाचण्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांचे नेमके आकडे समोर येत नाहीत,' असं डॉक्टरांनी सांगितलं.

'नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान वातावरणात बदल होतो. त्यामुळे सर्दी, खोकल्याचा त्रास होतो. दर हिवाळ्यात असा त्रास होत असल्यानं लोक दुर्लक्ष करतात. अशाच प्रकारचा त्रास कुटुंबातील बऱ्याचशा सदस्यांना होत असल्यास ही कोरोनाची लक्षणं असू शकतात. अशा परिस्थितीत चाचणी करून घ्यायला हवी,' असं बालीगंजमधील डॉ. सब्यसाची वर्धन यांनी सांगितलं.

सर्दी, खोकला, फ्लू झालेले अनेकजण कोरोना चाचणीनंतर पॉझिटिव्ह आढळून आलं. यातील बहुतांश रुग्ण घरीच बरे झाले. तर काहींनी रुग्णालयात दाखल करावं लागलं. एका आठवड्यात अशा प्रकारचे ४० रुग्ण आढळले. सध्या कोरोना झालेल्या रुग्णांना ओला खोकला, कफ होणारा खोकला अशा स्वरुपाचे त्रास होत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी कोरडा खोकल्याचा त्रास व्हायचा. आता ओल्या खोकल्यासोबत हलका ताप जाणवत आहे. दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोना बाधितांना जास्त ताप यायचा. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या