शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

Coronavirus: देशात ३० जूनपर्यंत 'लॉकडाऊन' असावे, 'या' राज्य सरकारने मांडली सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 16:34 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅबिनेट बैठक घेऊन लॉकडाऊनच्या वाढीसंदर्भात आणि कोरोनाच्या प्रादुर्भावातील देशातील परिस्तितीबाबत चर्चा केली. तसेच, सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतही मोदींनी लॉकडाऊन कालावधी

कोची - चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने भारतात शिरकाव केल्यानंतर हळूहळू कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. देशामध्ये महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. मात्र, देशातील सर्वच राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याचे दिसून येते. त्यामुळेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १४ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन असल्याची घोषणा केली आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. सर्वसामान्य नागरिकांसह देशातील दिग्गज राजकीय नेत्यांनाही या परिस्थितीला कठीण प्रसंगातून सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे, आता लॉकडाऊन नेमकं कधी संपणार, याचीच चर्चा रंगली आहे. पण, लॉकडाऊन कालावधी वाढविण्यात यावा, अशी मागणी अनेक राज्य सरकारकडून होत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅबिनेट बैठक घेऊन लॉकडाऊनच्या वाढीसंदर्भात आणि कोरोनाच्या प्रादुर्भावातील देशातील परिस्तितीबाबत चर्चा केली. तसेच, सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतही मोदींनी लॉकडाऊन कालावधी आणि इतर उपाययोजना याबाबत संवाद साधला. देशातील बहुतांश राज्य सरकारने लॉकडाऊन कालावधी वाढण्याची सूचना केल्याची माहिती आहे. देशातील परिस्थिती पाहून टप्प्या-टप्प्याने लॉकडाऊन कमी करताना देशात ३० जूनपर्यंत लॉकडाऊन ठेवण्याची सूचना केरळ राज्य सरकारने मांडली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वच राज्यांच्या राज्य सरकारला लॉकडाऊन संदर्भात सूचना देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, केरळ सरकारच्या उच्चस्तरीय समितीच्या सूचनेनुसार, विविध राज्यात कोरोना व्हायरसचे संक्रमण वेगवेगळ्या स्तरावर दिसून येत असल्याचे म्हटले आहे. तसेच, त्याआधारेच समितीने लॉकडाऊन संदर्भात प्रस्ताव सादर केला आहे. या समितीचे प्रमुख केरळचे माजी मुख्य सचिव आणि भारतीय सुरक्षा एक्सचेंज बोर्ड (सेबी) चे सदस्यही आहेत. या समितीने अनेक प्रकारे चाचपणी आणि संशोधन केले आहे. त्यामध्ये, आरोग्य, नागरिक, अर्थव्यवस्था आणि आरोग्य व्यवस्था याचा अभ्यास करण्यात आला आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात हवे तेवढ यश आले नसल्याने ३० जूनपर्यंत लॉकडाऊन ठेवण्याची सूचना या समितीने मांडली आहे. त्यांसंबधी काही नियम आणि अटीही या समितीने दिल्या आहेत. 

घरातून बाहेर पडताना मास्क लावणे अनिवार्य असणार आहे. लग्नसोहळ्यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी आवश्यक, पण लग्नाला २५ पेक्षा जास्त लोकं नसावेत. सर्वच कामकाज कार्यालय, खासगी गाड्या आणि परिवहन मंडळाच्या वाहतूकीमध्ये एसी बंद ठेवण्यात यावे. ५ पेक्षा अधिक कोरोना संक्रमित गाव, परिसर हा हॉटस्पॉट म्हणून घोषित करावा. तसेच, या संबंधित गावांमध्ये १०० पेक्षा अधिक लोकं संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेली असावीत,हॉटस्पॉट विभागांना पूर्णपणे बंद ठेवण्यात यावे, प्रशासनाने हा भाग सील करावा. आपात्कालीन परिस्थीत पोलीस आणि स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन मदतकार्य करावे. हॉटस्पॉट नसलेल्या भागात १५ एप्रिलनंतर तीन टप्प्यात लॉकडाऊन कमी करण्यात यावे. धार्मिक कार्यक्रम आणि आयोजित उपक्रमांना बंदी,  अंत्यसंस्काराला १० पेक्षा अधिक नागरिक असू नयेत

केरळ उच्चस्तरीय समितीने या शिफारसींसह ३० जूनपर्यंत देशात लॉकडाऊन ठेवण्याची सूचना मांडली आहे, याबाबत बीसीसी हिंदीने वृत्त दिले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीKeralaकेरळdelhiदिल्ली