शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: "मोदींचं पॅकेज म्हणजे निव्वळ फसवणूक; ते राज्यांना भिकाऱ्यासारखं वागवताहेत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 15:07 IST

पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजवर टीकास्त्र

हैदराबाद: कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेलं आर्थिक पॅकेज, केंद्राकडून राज्यांना मिळणारी वागणूक यावरुन तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तीव्र शब्दांत भाष्य केलं आहे. मोदींनी जाहीर केलेलं पॅकेज म्हणजे निव्वळ फसवणूक आहे. त्यातून त्यांनी केवळ आकड्यांचा खेळ केला आहे, अशा शब्दांत राव यांनी तोंडसुख घेतलं. केंद्राकडून राज्यांना भिकाऱ्यासारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. 'मोदींनी जाहीर केलेलं पॅकेज म्हणजे केवळ हवा आहे. केंद्रानं स्वत:ची प्रतिष्ठा कमी करुन घेतली आहे,' असा आरोप करत राव यांनी वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायद्यांतर्गत राज्यांना घेता येणाऱ्या कर्जाचा संदर्भ दिला. राज्यांना कर्ज घेण्यासाठी असलेल्या अटी वाढवण्यात आल्याचं राव यांनी सांगितलं. केंद्रीय अर्थमंत्र्यांना जीडीपी वाढवायचा होता की मोदींनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींपर्यंतच्या पॅकेजपर्यंत पोहोचायचं होतं, असा सवाल त्यांनी आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तांचा दाखला देत विचारला.'केंद्र सरकारनं जाहीर केलेलं पॅकेज अतिशय क्रूर आहे. त्यामधून सामंतशाही आणि हुकूमशाही दिसते. आम्ही याचा निषेध करतो. आम्ही केंद्राकडे असं पॅकेज मागितलं नव्हतं,' असं राव म्हणाले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापर्यंत केंद्रानं घेतलेल्या अनेक निर्णयांचं राव यांनी स्वागत केलं आहे. मात्र पॅकेजमुळे निराशा झाल्याचं मत राव यांनी व्यक्त केलं. कोरोनामुळे राज्यांचा महसूल घटला आहे. त्यामुळे राज्य सरकारांना निधीची आवश्यकता आहे, असं राव म्हणाले. लोकांपर्यंत विविध माध्यमांतून मदत पोहोचवण्यासाठी आम्ही तुमच्याकडे निधी मागत आहोत. मात्र तुम्ही आम्हाला भिकाऱ्यासारखं वागवता. केंद्राचं काम काय असतं? देशात अशाप्रकारे सुधारणा राबवल्या जातात का?, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. केंद्रानं जे काही जाहीर केलं त्याला पॅकेज म्हणायचं का, असा प्रश्न मला पडला आहे. संघराज्य पद्धतीत अशा प्रकारचं धोरण असू शकत नाही, असं राव म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी