शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

CoronaVirus News: "मोदींचं पॅकेज म्हणजे निव्वळ फसवणूक; ते राज्यांना भिकाऱ्यासारखं वागवताहेत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 15:07 IST

पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजवर टीकास्त्र

हैदराबाद: कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेलं आर्थिक पॅकेज, केंद्राकडून राज्यांना मिळणारी वागणूक यावरुन तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तीव्र शब्दांत भाष्य केलं आहे. मोदींनी जाहीर केलेलं पॅकेज म्हणजे निव्वळ फसवणूक आहे. त्यातून त्यांनी केवळ आकड्यांचा खेळ केला आहे, अशा शब्दांत राव यांनी तोंडसुख घेतलं. केंद्राकडून राज्यांना भिकाऱ्यासारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. 'मोदींनी जाहीर केलेलं पॅकेज म्हणजे केवळ हवा आहे. केंद्रानं स्वत:ची प्रतिष्ठा कमी करुन घेतली आहे,' असा आरोप करत राव यांनी वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायद्यांतर्गत राज्यांना घेता येणाऱ्या कर्जाचा संदर्भ दिला. राज्यांना कर्ज घेण्यासाठी असलेल्या अटी वाढवण्यात आल्याचं राव यांनी सांगितलं. केंद्रीय अर्थमंत्र्यांना जीडीपी वाढवायचा होता की मोदींनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींपर्यंतच्या पॅकेजपर्यंत पोहोचायचं होतं, असा सवाल त्यांनी आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तांचा दाखला देत विचारला.'केंद्र सरकारनं जाहीर केलेलं पॅकेज अतिशय क्रूर आहे. त्यामधून सामंतशाही आणि हुकूमशाही दिसते. आम्ही याचा निषेध करतो. आम्ही केंद्राकडे असं पॅकेज मागितलं नव्हतं,' असं राव म्हणाले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापर्यंत केंद्रानं घेतलेल्या अनेक निर्णयांचं राव यांनी स्वागत केलं आहे. मात्र पॅकेजमुळे निराशा झाल्याचं मत राव यांनी व्यक्त केलं. कोरोनामुळे राज्यांचा महसूल घटला आहे. त्यामुळे राज्य सरकारांना निधीची आवश्यकता आहे, असं राव म्हणाले. लोकांपर्यंत विविध माध्यमांतून मदत पोहोचवण्यासाठी आम्ही तुमच्याकडे निधी मागत आहोत. मात्र तुम्ही आम्हाला भिकाऱ्यासारखं वागवता. केंद्राचं काम काय असतं? देशात अशाप्रकारे सुधारणा राबवल्या जातात का?, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. केंद्रानं जे काही जाहीर केलं त्याला पॅकेज म्हणायचं का, असा प्रश्न मला पडला आहे. संघराज्य पद्धतीत अशा प्रकारचं धोरण असू शकत नाही, असं राव म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी