शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Coronavirus: आईच्या मृतदेहासमोरच मुलानं नवरीच्या गळ्यात हार घातला; हा क्षण पाहून संपूर्ण गाव हळहळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 15:42 IST

आपल्या आईची अशी अवस्था पाहून मुलगा राकेशनं साखरपुडा आणि लग्न स्थगित केले.

ठळक मुद्देअमेरिकेत राहणारा राकेज लग्नासाठी त्याच्या घरी परतला होता.परंतु या काळात आई रेणुका यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे तिला हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल करावे लागले.आई लवकरच बरी होऊन घरी परतेल या आशेवर घरातील सगळी मंडळी बसली होती.

हैदराबाद – तेलंगानामध्ये एक मनाला सुन्न करणारी घटना घडली आहे. आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला त्यानंतर तिच्याच मृतदेहासमोर मुलानं नवरीच्या गळ्यात हार घातला. ही घटना संगारेड्डी जिल्ह्यातील ईस्माईल खानपेट येथील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ईस्माइल खानपेट येथील पल्पानुरी रेणुका यांच्या तीन मुलांपैकी मधला मुलगा राकेशचा साखरपुडा ६ मे रोजी आणि लग्न २१ मे रोजी ठरलं होतं. त्यामुळे अमेरिकेत राहणारा राकेज लग्नासाठी त्याच्या घरी परतला होता. परंतु या काळात आई रेणुका यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे तिला हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल करावे लागले.

आपल्या आईची अशी अवस्था पाहून मुलगा राकेशनं साखरपुडा आणि लग्न स्थगित केले. आई लवकरच बरी होऊन घरी परतेल या आशेवर घरातील सगळी मंडळी बसली होती. त्याचवेळी रेणुका यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रेणुका यांच्या जाण्यानं कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. परंतु मुलाच्या लग्नासाठी आईनं खूप वाट पाहिली होती. त्यामुळे राकेशनं आईच्या मृतदेहासमोरच लग्न करण्याचा निर्णय घेतला. दु:खात असलेले नवरा-नवरी दोघांनी आई रेणुकाच्या मृतदेहासमोरच एकमेकांच्या गळ्यात हार घालून लग्नाचे विधी पार पाडले.

हे लग्न पाहून संपूर्ण गावात शांतता पसरली होती. बघणाऱ्याच्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं. ज्याठिकाणी जल्लोषात लग्न लावलेली दिसतात, आनंद-उत्साह असतो. मात्र या लग्नानं प्रत्येकाचं ह्दय पिळवटून टाकलं होतं. अशाच परिस्थितीत दोघांचे लग्न पार पाडले. आई रेणुका यांचा भाऊ श्रीशैलम यांचाही १० दिवसांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

तेलंगाणामध्ये कोरोनाची परिस्थिती काय?

गुरुवारी तेलंगाणामध्ये ३ हजार ६१४ कोरोनाबाधित आढळले होते. त्यानंतर राज्यातील एकूण रुग्णसंख्या ५ लाख ६७ हजार पेक्षा जास्त झाली. तर १८ जणांच्या मृत्यूनंतर आतापर्यंत कोरोना मृतांचा आकडा ३ हजार २०७ पर्यंत पोहचला आहे. हैदराबाद महापालिका परिसरात सर्वाधिक ५०४ रुग्ण आढळले. तर नलगौंडा २२९, खम्मम येथे २२८ कोरोनाबाधित आढळले आहेत. राज्यात ३८ हजार २६७ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. राज्यात रुग्णसंख्येत होणारी घट पाहता ३० मेनंतर राज्यातील लॉकडाऊन हटवण्याची शक्यता आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या