शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: आईच्या मृतदेहासमोरच मुलानं नवरीच्या गळ्यात हार घातला; हा क्षण पाहून संपूर्ण गाव हळहळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 15:42 IST

आपल्या आईची अशी अवस्था पाहून मुलगा राकेशनं साखरपुडा आणि लग्न स्थगित केले.

ठळक मुद्देअमेरिकेत राहणारा राकेज लग्नासाठी त्याच्या घरी परतला होता.परंतु या काळात आई रेणुका यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे तिला हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल करावे लागले.आई लवकरच बरी होऊन घरी परतेल या आशेवर घरातील सगळी मंडळी बसली होती.

हैदराबाद – तेलंगानामध्ये एक मनाला सुन्न करणारी घटना घडली आहे. आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला त्यानंतर तिच्याच मृतदेहासमोर मुलानं नवरीच्या गळ्यात हार घातला. ही घटना संगारेड्डी जिल्ह्यातील ईस्माईल खानपेट येथील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ईस्माइल खानपेट येथील पल्पानुरी रेणुका यांच्या तीन मुलांपैकी मधला मुलगा राकेशचा साखरपुडा ६ मे रोजी आणि लग्न २१ मे रोजी ठरलं होतं. त्यामुळे अमेरिकेत राहणारा राकेज लग्नासाठी त्याच्या घरी परतला होता. परंतु या काळात आई रेणुका यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे तिला हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल करावे लागले.

आपल्या आईची अशी अवस्था पाहून मुलगा राकेशनं साखरपुडा आणि लग्न स्थगित केले. आई लवकरच बरी होऊन घरी परतेल या आशेवर घरातील सगळी मंडळी बसली होती. त्याचवेळी रेणुका यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रेणुका यांच्या जाण्यानं कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. परंतु मुलाच्या लग्नासाठी आईनं खूप वाट पाहिली होती. त्यामुळे राकेशनं आईच्या मृतदेहासमोरच लग्न करण्याचा निर्णय घेतला. दु:खात असलेले नवरा-नवरी दोघांनी आई रेणुकाच्या मृतदेहासमोरच एकमेकांच्या गळ्यात हार घालून लग्नाचे विधी पार पाडले.

हे लग्न पाहून संपूर्ण गावात शांतता पसरली होती. बघणाऱ्याच्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं. ज्याठिकाणी जल्लोषात लग्न लावलेली दिसतात, आनंद-उत्साह असतो. मात्र या लग्नानं प्रत्येकाचं ह्दय पिळवटून टाकलं होतं. अशाच परिस्थितीत दोघांचे लग्न पार पाडले. आई रेणुका यांचा भाऊ श्रीशैलम यांचाही १० दिवसांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

तेलंगाणामध्ये कोरोनाची परिस्थिती काय?

गुरुवारी तेलंगाणामध्ये ३ हजार ६१४ कोरोनाबाधित आढळले होते. त्यानंतर राज्यातील एकूण रुग्णसंख्या ५ लाख ६७ हजार पेक्षा जास्त झाली. तर १८ जणांच्या मृत्यूनंतर आतापर्यंत कोरोना मृतांचा आकडा ३ हजार २०७ पर्यंत पोहचला आहे. हैदराबाद महापालिका परिसरात सर्वाधिक ५०४ रुग्ण आढळले. तर नलगौंडा २२९, खम्मम येथे २२८ कोरोनाबाधित आढळले आहेत. राज्यात ३८ हजार २६७ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. राज्यात रुग्णसंख्येत होणारी घट पाहता ३० मेनंतर राज्यातील लॉकडाऊन हटवण्याची शक्यता आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या