शहरं
Join us  
Trending Stories
1
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
3
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
4
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
5
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
6
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
7
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
8
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
9
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
10
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
11
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
12
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
13
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
14
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
15
"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण
16
'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
17
तपोवन वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली?
18
"परीक्षेच्या चार दिवस आधी…" T20 वर्ल्ड कप तयारीच्या प्रश्नावर सूर्यानं दिला थेट शाळेचा दाखला
19
आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद दिलं तर काय करणार? भास्कर जाधव यांचं मोठं विधान, म्हणाले...
20
'सध्यातरी' शब्दात अडकले वडेट्टीवार; मग म्हणाले, "मुद्दाम बोललो..., जेलमध्ये जाईन, पण भाजपमध्ये जाणार नाही...!" नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus :...म्हणून जनतेची माफी मागत मोदींनी देशवासीयांना दिला हा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2020 12:42 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात च्या माध्यमातून आज पुन्हा एकदा देशवासीयांशी संवाद साधला.

ठळक मुद्देनरेंद्र मोदींनी अचानक घेतलेल्या लॉकडाऊनच्या कठोर निर्णयामुळे देशातील गरिबांना झालेल्या त्रासाबद्दल माफी मागितलीकोरोनाविरोधातील लढाई ही जीवन मरणाची लढाई लॉकडाऊनचा नियम तोडल्यास कोरोनापासून वाचता येणार नाही

नवी दिल्ली -  देशात पसरत असलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीमन की बात च्या माध्यमातून पुन्हा एकदा देशवासीयांशी संवाद साधला.  यावेळी नरेंद्र मोदींनी अचानक घेतलेल्या लॉकडाऊनच्या कठोर निर्णयामुळे देशातील गरिबांना झालेल्या त्रासाबद्दल माफी मागितली. तसेच कोरोनाविरोधातील लढाई ही जीवन मरणाची लढाई असल्याचे सांगत मोदींनी लॉकडाऊनचा नियम तोडल्यास कोरोनापासून वाचता येणार नाही, असा सल्ला देशवासीयांना दिला.

मन की बात च्या माध्यमातून देशवासियांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, ''आज देश आणि संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाशी झुंजत आहे. आपल्या देशासमोर आलेल्या संकटामुळे मला लॉकडाऊनसारखा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे. या कठोर निर्णयासाठी मला माफ करा. मी सर्वांना घरात कोंडून ठेवले आहे. पण कोरोनापासून वाचण्यासाठी इतर कुठला पर्याय नव्हता.''

कोरोनापासून बाचावासाठी सर्व मानवजातीला संकल्प करावा लागणार आहे. कोरोनाविरोधातील लढाई म्हणजे जीवन मरणाची लढाई आहे. लॉकडाऊनच्या नियमाचे पुढच्या अनेक दिवसांपर्यंत पालन करावे लागणार आहे. तसेच काही लोक लॉकडाऊनचे पालन करत नसल्याचे दिसून आले आहे. आपल्याला लक्ष्मणरेषा आखून घ्यावी लागेल. मात्र लॉकडाऊनचा नियम तोडल्यास कोरोनापासून वाचता येणार नाही.  इतर काही देशांनी याचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे आवश्यक ती काळजी घ्या असे आवाहन मोदींनी केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बात