शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

CoronaVirus: रुग्णाचे अंत्यसंस्कार करताना अशी घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 07:07 IST

भावनांना क्षणभर आवर घालत, वैज्ञानिक दृष्टिकोनातून याकडे पाहिले तर या प्रश्नांची उत्तरे मिळतात...

काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यात ६३ वर्षांच्या व्यक्तीचे कोविड-१९ मुळे निधन झाले. नातेवाईक, गावकरी कोणीच पुढे न आल्याने प्रशासनातील व्यक्तींनी पुढाकार घेत अंत्यसंस्कार पार पाडले. या ठिकाणी प्रशासनाने घेतलेली संवेदनशील भूमिका प्रशंसनीय होती. पण ही घटना फार अस्वस्थ करणारी होती. लागण होण्याच्या भीतीपायी दिली गेलेली टोकाची प्रतिक्रिया, असे या घटनेचे थोडक्यात वर्णन करता येईल. नातेवाईक-गावकरी मृत व्यक्तीला बघायला, स्मशानापर्यंत यायला, अंत्यसंस्कार करायला तयार नसणे, अ‍ॅम्बुलन्सचा ड्रायव्हर शव वाहून न्यायला तयार नसणे, मृतदेह वाहून नेणाऱ्या व्यक्तींनी केलेला अंतराळवीरासारखा नखशिखांत पेहेराव, अग्नी दिल्यानंतरही राखेची, जमिनीची केली गेलेली जंतुनाशक फवारणी हे सगळे या भीतीचे आविष्कार. यामुळे नक्की काय साधले, असा प्रश्न त्यातून उपस्थित होतो. भावनांना क्षणभर आवर घालत, वैज्ञानिक दृष्टिकोनातून याकडे पाहिले तर या प्रश्नांची उत्तरे मिळतात...‘कोविड-१९’ हा श्वसनसंस्थेचा आजार आहे. लागण झालेल्या व्यक्तीच्या शिंकणे, खोकणे, बोलणे, थुंकणे या क्रियांमधून कोरोना विषाणू बाहेर फेकला जातो. अर्थात, मृत्यूनंतर या मागार्तून होणारा प्रसार थांबतो. मृताच्या श्वसनमार्गातील स्रावांचा इतरांशी संपर्क आला तरच लागणीची शक्यता राहते. मग ही शक्यता कशी कमी करता येईल?केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने यासंदर्भात काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार मृत व्यक्तीच्या नाका-तोंडात किंवा इतरत्र घातलेल्या नळ्या सोडियम हायपोक्लोराईटच्या (ब्लिच) द्रावणात बुडवून त्यांची विल्हेवाट लावणे, नाका-तोंडातून, उघड्या जखमांतून स्राव बाहेर पडू नये, याची खबरदारी घेणे, मृत शरीराला प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळणे, ती पिशवी बाहेरून ब्लिचने पुसून घेणे, त्यावर दुसरे आवरण घालणे, त्या व्यक्तीचे कपडे, वस्तू, तिथली जागा या सगळ्याची स्वच्छता ब्लिच वापरून करणे या गोष्टी गरजेच्या आहेत.हे सगळं हॉस्पिटलचे कर्मचारी करतील. ते करताना ग्लोव्ह्ज, एन-९५ मास्क, प्लॅस्टिक अ‍ॅप्रॉन इत्यादी घालणे आवश्यक आहे. ही सर्व काळजी घेतल्यानंतर मृतदेह हाताळणाºया व्यक्ती, वाहनचालक यांनी हातात ग्लोव्ह्ज, तोंडाला मास्क लावला पाहिजे. मृतदेह घरी न नेता हॉस्पिटलमधून परस्पर स्मशानभूमीवर नेला पाहिजे. अंत्यसंस्कार करताना मृतदेहाला स्पर्श होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.स्मशानभूमीत उपस्थित असलेल्यांनी सध्याच्या काळात घ्यायची काळजी येथेही लागू पडते. अशा दु:खद प्रसंगी डोळ्यात अश्रू येणे, आधारासाठी-सांत्वनासाठी आपला माणूस जवळ असावा अस वाटणे साहजिक आहे. पण या भावनांना आवर घालत, मास्क वापरणे, तोंड-नाक-डोळ्यांना हात न लावणे, वारंवार हात धुणे, इतरांपासून किमान ३-६ फुटांचे अंतर राखणे, घरी आल्याबरोबर अंघोळ करणे, कपडे धुवायला टाकणे आवश्यक आहे. अग्नी दिल्यानंतरच्या राखेत किंवा दफन केलेल्या मातीत विषाणू जिवंत शिल्लक राहू शकत नसल्याने त्यावर जंतुनाशक टाकायची आवश्यकता नाही.संसर्गाचा धोका टाळण्यासाठी या गोष्टी पुरेशा आहेत. पण साताºयासारखे प्रसंग गैरसमज पसरवतात, धास्ती वाढवतात. यातून अनेक अनावश्यक कृती घडत राहतात. आजार, मृत्यूची भीती यामध्ये भेदभाव, दूषणांची भर पडली तर त्याचा परिणाम आजार लपवणे, डॉक्टरांकडे न जाणे असा होऊ शकतो. यापूर्वी अनेक आजारांच्या साथींमध्ये असा अनुभव आला आहे.वैज्ञानिक तथ्ये समजून घेतली तर आपण अनाठायी भीतीवर मात करत स्वत:ची योग्य काळजी घेऊ शकू. ‘कोविड-१९’विरुद्धच्या युद्धात एक व्यक्ती म्हणून आपले हे योगदान महत्त्वाचे असेल.- डॉ. रितू परचुरे, प्रयास आरोग्य गट, पुणे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या