शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

coronavirus: होय, 475 रुपयात किराणा सामान घरपोच द्या, जिल्हाधिकाऱ्यांचे दुकानदारांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 15:46 IST

जगभरातील शक्तिशाली देश प्रयत्न करून कसे असहाय झाल्याचे आणि आरोग्यतज्ज्ञ आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीचा हवाला देत तमाम भारतवासीयांना ‘लॉकडाऊन’चे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले.

मुंबई - कोरोना विषाणूंच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. एक-दुसऱ्यापासून दूर राहणे (सोशल डिस्टन्सिंग, सामाजिक दुरावा), घराबाहेर न पडणे, घरातच राहणे, हा एकमेव मार्ग आहे. यात जराही निष्काळजीपणा केल्यास भारताला जबर किंमत मोजावी लागेल. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे, असे कळकळीने सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी मध्यरात्रीपासून देशभरात २१ दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यानंतर, किराणा दुकान आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानी एकच झुंबड उडाली. स्थानिक प्रशासनाकडून याबाबत खबरदारी घेऊन उपाययोजना करण्यात येत आहेत. 

जगभरातील शक्तिशाली देश प्रयत्न करून कसे असहाय झाल्याचे आणि आरोग्यतज्ज्ञ आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीचा हवाला देत तमाम भारतवासीयांना ‘लॉकडाऊन’चे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. मात्र, तरीही भाजीपाला, किराणा दुकानात नागरिकांच मोठी गर्दी होताना दिसून येतंय. या गर्दीचा फायदा घेत काही किराणा दुकानदार आणि व्यापाऱ्यांकडून चढ्या दराने मालाची विक्री होत आहे. नागरिकांच्या तशा तक्रारीही आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अयोध्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी भन्नाट आयडिया केली आहे. नागरिकांची गर्दी होऊ नये, यासाठी घरपोच किराणा सामान पोहोचविण्याच जबाबदारी किराणा दुकानदारांना दिली आहे. विशेष म्हणजे जादा दराने विक्री होऊ नये म्हणून ११ वस्तूंची यादीही प्रशासनाने संबंधित दुकानदारांना दिली आहे. त्यानुसार ४७५ रुपयात ११ सामानांची पिशवी नागरिकांच्या घरपोच देण्यात येत आहे. 

अयोध्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार २ एप्रिलपर्यंत हा नियम आणि सेवा सुरूच राहणार आहे. प्रशासनाने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम घेणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAyodhyaअयोध्याNarendra Modiनरेंद्र मोदीcollectorजिल्हाधिकारी