शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

CoronaVirus News: संसर्गाच्या भीतीने पर्यटकांनी फिरविली खजुराहोकडे पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 02:49 IST

सर्व हॉटेल रिकामी; सगळ्यांचे व्यवसाय आले अडचणीत

भोपाळ : शाळा, महाविद्यालयांच्या सुट्या लागताच देशभरात पर्यटन वाढते. मध्य प्रदेशातील खजुराहोलाही पर्यटकांची एकच गर्दी होते. तिथे आलेले हजारो पर्यटक खजुराहोनंतर राज्यातील अनेक पर्यटनस्थळांना भेटी देतात. पण यंदा शाळा-महाविद्यालये सुरू झाली नसली तरी नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. पण कोरोनामुळे तब्बल ७५ दिवसांची सुटी असूनही यंदा खजुराहोला पर्यटक आलेच नाहीत. त्यामुळे येथील हॉटेल रिकामी आहेत आणि पर्यटन आणि पर्यटकांवर अवलंबून असलेले सर्व व्यवसाय आणि छोटे व्यावसायिक अडचणीत आले आहेत.मार्चपासून रेल्वेगाड्या बंद झाल्या. बराच काळ विमानसेवाही बंद होती आणि बसेसही लोकांविना रस्त्यांवर उभ्या होत्या. या ७५ दिवसांत त्यामुळे राज्याबाहेरील वा परदेशी पर्यटक तर सोडाच, पण मध्य प्रदेशातील कोणीही खजुराहोला आले नाही. उन्हाळ्याच्या काळात विवाहांचे अनेक मुहूर्त असतात आणि त्यामुळे बरीच जोडपी खजुराहोला हमखास येतात. पण यंदा लॉकडाऊ न आणि निर्बंधांमुळे विवाहही पुढे ढकलले गेले. काहींनी केवळ घरच्या मंडळींच्या उपस्थितीतच विवाह केले. पण त्यानंतर जोडप्यांना हनिमूनला वा फिरायला जाण्याची संधीच मिळाली नाही.मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून खजुराहो आणि परिसरातील सर्व हॉटेल बंद आहेत आणि पर्यटनावर अवलंबून असलेले सुमारे अडीच लाख लोक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. आता हळूहळू निर्बंध उठण्यास सुरुवात झाली असली तरी पावसाळा सुरू होत असल्याने आणि अद्यापही कोरोना विषाणूच्या संसर्गाची भीती असल्याने या काळात पर्यटक येण्याची शक्यता अजिबातच नाही. पर्यटनाचे तीन महिने आम्ही घरीच बसून काढले आणि दिवाळीपर्यंत तरी स्थिती सुधारेल का, हे सांगता येत नाही, असे अनेक दुकानदार, छोटे व्यावसायिक यांनी बोलून दाखविले. (वृत्तसंस्था)एकही विदेशी दिसला नाहीगेल्या तीन महिन्यांत आम्ही एकही परदेशी पर्यटक वा व्यक्ती पाहिली नाही, असे एका व्यावसायिकाने सांगितले. तो म्हणाला, खजुराहोहून भोपाळ३५0 किलोमीटर अंतरावर आहे. पण विमानसेवाच बंद होती. त्यामुळे कोणी इथे फिरकलेच नाही. शिवाय जगभर कोरोनाचा कहर असताना आणि जगभरात विमानसेवा बंद असताना परदेशी लोक येथील, अशी अपेक्षा ठेवणेही चुकीचेच होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या