शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus:एवढी एक साधी गोष्ट केली, तरी कोरोनाचं संकट 60 टक्क्यांनी कमी होईल; वाचा काय सांगतंय ICMR

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 10:10 IST

देशातील ५४८ जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लोकांना घरातून बाहेर पडू नका असं आवाहन केले आहे.

ठळक मुद्देभारतात कोरोना व्हायरस दुसऱ्या टप्प्यात आहे. तिसऱ्या टप्प्याकडे भारत जात आहे. कम्यूनिटी ट्रान्समिशन झालं तर भारतातील परिस्थिती भयंकर होईलवेळीच केंद्र आणि राज्य सरकारने कठोर पावलं उचलावीत.

नवी दिल्ली – जगभरासह भारतातही कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या देशात ५०० पर्यंत पोहचली आहे तर १० जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या ५ दिवसात कोरोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय देशातील अनेक राज्य सरकारने घेतला आहे. तरीही कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत चालली आहे.

देशातील ५४८ जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लोकांना घरातून बाहेर पडू नका असं आवाहन केले आहे. यातच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च(ICMR) ने नुकताच केलेल्या अहवालात दावा केला आहे की, जर लोकांना घरातच राहण्याची सक्ती केली तर कोरोनाचा प्रार्दुभाव रोखणं बऱ्याच प्रमाणात फायदेशीर ठरेल.

भारतात कोरोना व्हायरस दुसऱ्या टप्प्यात आहे. तिसऱ्या टप्प्याकडे भारत जात आहे. या टप्प्यात कम्यूनिटी ट्रान्समिशन होतं. म्हणजे सामूहिक संसर्ग होईल. जर असं झालं तर भारतातील परिस्थिती भयंकर होईल. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन केंद्र सरकार आणि राज्य सरकारने कडक पावले उचलावी. लोकांनी एकमेकांशी संपर्क साधू नये म्हणून लॉकडाउन आणि कर्फ्यूचा अवलंब केला जात आहे. आयसीएमआरच्या अभ्यासामध्ये नमूद केलं आहे की, जर लोकांना विलग ठेवणे, घरात राहण्याची सक्ती अशी कठोर मार्ग अवलंबले गेले तर या विषाणूची अंदाजित संशयित रुग्ण 62 टक्क्यांनी कमी होऊ शकतात.

अशा परिस्थितीत सरकारने संपूर्णपणे अंमलबजावणीसाठी लॉकडाउनचा मार्ग स्वीकारला पाहिजे. जगाच्या इतर देशांकडून आतापर्यंत आलेल्या बातम्यांमधून असं दिसून आलं आहे की ज्या देशांमध्ये होम कोरेन्टाईन आणि लॉकडाऊन अवलंब केला गेला त्या देशांमध्ये कोरोना जास्त काळ टिकला नाही. सिंगापूर, हाँगकाँग आणि दक्षिण कोरिया ही सर्वात मोठी उदाहरणे आहेत. डब्ल्यूएचओने लॉकडाउनसह संक्रमित लोकांची ओळख आणि चाचणी करणेदेखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोरोनापासून भारताला वाचवण्यासाठी लोकांच्या सहकार्याची गरज आहे. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची राज्यातील संख्या १०१ झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMedicalवैद्यकीय