शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

Coronavirus: दिलासादायक! गेल्या २४ तासात राजधानी दिल्लीत एकही कोरोना रुग्ण आढळला नाही, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 11:05 IST

दिल्लीच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राजधानी दिल्लीत आतापर्यंत ३० जणांना कोरोनाची लागण झाली आहे

ठळक मुद्देकर्नाटकात 33 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे, तर एकाचा मृत्यू महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांची संख्या १०० च्या वर पोहचली राजधानी दिल्लीने कोरोनाची साखळी ब्रेक केली पण काळजी घेणं आवश्यक

नवी दिल्ली – जगभरात कोरोना व्हायरसने अनेक देशांना आपल्या विळख्यात ओढलं असताना भारतातही कोरोना रुग्णांची संख्या ५०० वर पोहचली आहे. आतापर्यंत १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असतानाच दिल्लीतून एक दिलासादायक बातमी आली आहे. गेल्या 24 तासांत राजधानीत कोरोनाचा कोणताही नवीन रुग्ण आढळलेला नाही.

पहिल्या तीन दिवसांत दिल्लीत 16 जणांना कोरोनाची लागण झाली होती. अशा परिस्थितीत सोमवारी कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तुटलेली पाहायला मिळाली. मात्र असं असलं तरी अद्यापही कोरोनाचा संक्रमणाचा धोका कायम आहे. पुढील काही दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. म्हणूनच डॉक्टर लोकांना घरामध्येच राहण्याचा सल्ला देत आहेत जेणेकरून संक्रमणाचा धोका कमी करता येईल.

दिल्लीच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राजधानी दिल्लीत आतापर्यंत ३० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. २० मार्च ते २२ मार्च या तीन दिवसात १६ रुग्णांची नोंद झाली. यातील ५ रुग्णांची तब्येत बरी झाली असून त्यांना घरी सोडण्यात आलं तर मागील दिवसात एका रुग्णाचा मृत्यू झाला. सध्या सफदरजंग रुग्णालयात ११ रूग्ण दाखल आहेत. लोकनायक रुग्णालयात ६, राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 5 आणि जीटीबीमध्ये एक रुग्ण दाखल आहे.

इतर राज्यांची काय परिस्थिती?

कर्नाटकात 33 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे, तर एकाचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात 30 लोक कोरोना संक्रमित आहेत. दिल्लीत 29 लोकांना याची बाधा झाली असून, एकाचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये 29 संक्रमित असून, एकाचा मृत्यू झाला आहे. हिमाचलमध्येही 3 संक्रमित असून, एकाचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात संक्रमितांची संख्या 97 असून, आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पंजाबमध्ये 21 जण संक्रमित आढळले असून, एकाचा मृत्यू ओढवला आहे. पश्चिम बंगालमध्ये सात जणांना संसर्ग झालेला असून, एकाचा मृत्यू झाला आहे. या विषाणूला नियंत्रित करण्यासाठी सरकारनं काही निर्बंध लादले असून, त्याचे उल्लंघन करणार्‍यांवर केंद्र सरकारने कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्ली