शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

Coronavirus : वृत्तपत्रे, वृत्त वाहिन्यांचे कामकाज विनाअडथळा सुरू राहिले पाहिजे, माहिती व प्रसारण मंत्रालयाचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 05:30 IST

coronavirus : २३ मार्च रोजी मंत्रालयाने केंद्रशासित प्रदेश व राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘‘वृत्तसंस्था आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांसारखे भक्कम माहिती प्रसारित करणारे नेटवर्क्स हे खरी, विश्वसनीय माहिती वेळेवर पोहोचेल यासाठी फारच महत्त्वाचे आहे.’’

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्याच्या परिस्थितीत वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे कामकाज विनाअडथळा सुरू राहील याची काळजी घ्यावी, असे आवाहन माहिती आणि प्रसारण (आय अँड बी) मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केले आहे.२३ मार्च रोजी मंत्रालयाने केंद्रशासित प्रदेश व राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘‘वृत्तसंस्था आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांसारखे भक्कम माहिती प्रसारित करणारे नेटवर्क्स हे खरी, विश्वसनीय माहिती वेळेवर पोहोचेल यासाठी फारच महत्त्वाचे आहे.’’ जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठीच माहितीचे हे जाळे योग्यरीत्या काम करणे आवश्यक आहे, असे नाही तर संपूर्ण देशाला ताज्या घडामोडींची माहिती देण्यासाठीही गरजेचे आहे. खोट्या आणि बनावट बातम्या टाळणे आवश्यक आहे.राज्य सरकारांनी आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनाने या सेवा सुरळीत सुरू राहतील याची खात्री करावी. दूरचित्रवाणी वाहिन्या (टीव्ही चॅनल्स), वृत्तसंस्था, टेलिपोर्ट आॅपरेटर्स, डिजिटल सॅटेलाईट न्यूज गॅदरिंग, डीटीएच (डायरेक्ट टू होम) आणि हायएंड-इन-द-स्काय, मल्टी सिस्टीम आॅपरेटर्स, केबल आॅपरेटर्स, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन (एफएम) रेडिओ आणि कम्युनिटी रेडिओ स्टेशन्स आदींचा यात समावेश आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याचा विचार असल्यास वरील सेवा, संस्थांची साखळी कोणताही अडथळा न येता सुरू राहण्यास परवानगी असली पाहिजे, असे पत्रात म्हटले आहे. प्रसारमाध्यमांच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी वाहनांच्या हालचाली, त्यांना गरज भासल्यास इंधनाची व्यवस्था करावी, विनाअडथळा वीजपुरवठा व इतर अनुषंगिक आवश्यक गोष्टी त्या त्या संस्थांनी मागितल्यास द्याव्यात, असेही त्यात म्हटले.वृत्तपत्रांवर विश्वास ठेवाकोरोना विषाणूबद्दल आम्हाला सगळे काही माहिती नसल्यामुळे चुकीची माहिती मोठ्या प्रमाणावर पसरते. त्यातील काही लोकांच्या मनात खोलवर जाऊन बसते. वृत्तपत्रे मात्र अशा घातक विषाणूचा फैलाव करीत नाहीत याची याद्वारे खात्री दिली जात आहे. जागतिक आरोग्य संघटना, सीडीसी, अनेक नामवंत डॉक्टर्स आणि आघाडीच्या अतिसूक्ष्म विषाणूतज्ज्ञांनीही वृत्तपत्रांवरील हा आरोप खोडून काढला आहे. एवढेच काय केंद्र आणि राज्य सरकारांनीही वृत्तपत्रांना अत्यावश्यक सेवेत ठेवले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या