शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : लस पुढील वर्षापर्यंत येण्याची शक्यता नाही - केंद्र सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2020 01:26 IST

‘कोवॅक्सिन’ ही संभाव्य देशी लस ‘भारत बायोटेक’ व पुण्याची ‘नॅशनल इन्स्टिट्यूूट आॅफ व्हारॉलॉजी’ यांच्या संयुक्त प्रयत्नांतून विकसित केली जात आहे.

नवी दिल्ली : भारतामध्ये तयार होणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लशीच्या चाचण्या येत्या १५ आॅगस्टपासून सुरु करण्याची शेखी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) मिरवीत असली तरी अशी कोणताही देशी किंवा परदेशी लस पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत तरी उपलब्ध होण्याची शक्यता वाटत नाही, असे सरकारतर्फे संदीय समितीस सांगण्यात आले आहे.केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाशी संलग्न संसदेच्या स्थायी समितीपुढे या मंत्रालयाचे अधिकारी, जैवविज्ञान विभागाचे वैज्ञानिक व सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. के. विजय राघवन यांनी कोरोना साथीची स्थिती व ती आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नांतील प्रगती याविषयी सविस्तर माहिती दिली.सूत्रांनुसार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी समितीस सांगितले की, भारतात कोरोनावरील लस पुढील वर्षाच्या सुरुवातीस बाजारात येऊ शकेल. लस भारतात किंवा विदेशात विकसित कलेली पण भारतात उत्पादित केलेली असू शकेल. देशाच्या सुरक्षेएवढेच जनतेचे आरोग्य जपणेही महत्त्वाचे आहे, यावर भर देऊन अधिकाºयांनी सुचविले की, ३० हजारांहून कमी किमतीचे व्हेंटिलेटर व अन्य माफक दराची वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करण्याचीही गरज आहे.‘कोवॅक्सिन’ ही संभाव्य देशी लस ‘भारत बायोटेक’ व पुण्याची ‘नॅशनल इन्स्टिट्यूूट आॅफ व्हारॉलॉजी’ यांच्या संयुक्त प्रयत्नांतून विकसित केली जात आहे. या लशीची ज्या इस्पितळांमध्ये चाचणी घ्यायची आहे त्यांना पाठविलेल्या पत्रात ‘आयसीएमआर’चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी ही लस १५ आॅगस्टपासून इस्पितळांना उपलब्ध करून देण्याचा दावा केला होता. अनेक वैज्ञानिक व तज्ज्ञांनी या विषयी शंका उपस्थित केली होती.मजेची गोष्ट अशी की, कोरोनावर लस बनविण्याच्या जगभरातील प्रयत्नांचा आढावा घेणारा डॉ. के. विजय राघवन यांनीच लिहिलेला एक वृत्तांत ‘पत्र सूचना कार्यालय’ (पीआयबी) या सरकारच्या प्रसिद्धी संस्थेने गेल्या आठवड्यात प्रसिद्धीसाठी जारी केला होता. त्यातही लस २०२१ पूर्वी उपलब्ध होण्याची शक्यता नाही, असा उल्लेख होता. परंतु ‘पीआयबी’ने ते वाक्य काढून टाकून काही मिनिटांतच नवे प्रसिद्धीपत्रककाढले होते.३० पैकी सहा सदस्य हजरसमितीच्या बैठकीला ३० पैकी फक्त सहा सदस्य उपस्थित होते. समितीचे अध्यक्ष जयराम रमेश यांनी अडचणी असूनही हजर राहिलेल्या सदस्यांचे आभार मानले. समित्यांच्या बैठका ‘व्हर्च्युअल’ पद्धतीने घेऊ देण्याची विनंती रमेश यांनी राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांना गेल्या महिनाभरात तीन वेळा केली. परंतु समितीच्या नियमांत बदल करायचे असतील तर त्यासाठी संपूर्ण सभागृहात तसा ठराव मंजूर करून घ्यावा लागतो. सध्या ते शक्य नसल्याने ‘व्हर्च्युअल’ बैठकांना परवानगी मिळू शकलेली नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या