शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: बिनकामाच्या चाचण्या बंद करा; देशातील ३५ डॉक्टरांचे केंद्र-राज्य सरकारला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 07:46 IST

केंद्र आणि राज्याच्या आरोग्य यंत्रणांनी या अनावश्यक उपचारपद्धती आणि चाचणीचा वापर थांबविला पाहिजे, अशी विनंती डॉक्टरांनी या पत्राद्वारे केली आहे. 

मुंबई : भरमसाठ चाचण्या आणि त्याची अवाजवी बिले यांनी गांजलेल्या रुग्णांच्या व्यथेला आता डॉक्टरांकडूनही आवाज मिळाला आहे. रुग्णांच्या लुटीचे मोठे जाळे मानल्या जाणाऱ्या या चाचण्यांवर राज्य सरकारने दरनिश्चितीचे बंंधन आणले होते. त्यालाही व्यावसायिकांनी विरोध केला. त्याचेच पडसाद कोरोनाच्या दोन लाटांमध्ये पडलेले दिसले. आधीच खचलेला रुग्ण आणि त्याचे नातेवाईक यांच्यावर मानसिक ताण निर्माण करणाऱ्या या बिनकामाच्या चाचण्यांवर भर दिला जातोय, असा दावा देशातील ३५ तज्ज्ञ डॉक्टरांनी केला आहे. केंद्र आणि राज्याच्या आरोग्य यंत्रणांनी या अनावश्यक उपचारपद्धती आणि चाचणीचा वापर थांबविला पाहिजे, अशी विनंती डॉक्टरांनी या पत्राद्वारे केली आहे. विविध राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या ३५ डॉक्टरांनी केंद्र आणि राज्य सरकारला पत्र पाठविले आहे. यातील ३५ डॉक्टरांपैकी डॉ.संजय नागराल यांनी सांगितले, कोविड उपचार, चाचणी आणि रुग्णालयात भरती करणे, यावर देशात अनावश्यक भर दिला जात आहे. सद्यस्थितीबाबत ही भूमिका सरकारपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या पत्राद्वारे करण्यात आला आहे.अमेरिकेतील हार्वर्ड आणि जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील भारतीय वंशाच्या काही डॉक्टरांनी या पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या पत्रातील माहितीनुसार, २०२१च्या कोरोना लाटेतील काही चुकांची पुनरावृत्ती २०२२ मध्ये होत आहे. डॉक्टरांच्या चमूने तीन प्रमुख समस्या मांडल्या आहेत. अवास्तव औषधोपचार, अवाजवी चाचण्या आणि आवश्यकता नसतानाही रुग्णालयात भरती करणे, ओमायक्रॉनची लक्षणे सौम्य आहेत. काही रुग्णांना तर औषधांचीही आवश्यकता नाही किंवा त्यांना किरकोळ औषधोपचारानंतर रुग्ण बरे होत आहेत, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.कुटुंबावरील आर्थिक ताण वाढतोय औषधांच्या अति वापरामुळे दुसऱ्या लाटेदरम्यान म्युकरचा उद्रेक झाला. बहुसंख्य रुग्णांची आधी रॅपिड अँटिजन टेस्ट, आरटीपीसीआर चाचणी करणे गरजेचे आहे. यानंतर, संबंधित रुग्णांना फक्त विलगीकरण ठेवले, तरी पुरेसे आहे. मात्र, अशा रुग्णांनाही सीटी स्कॅन, तसेच महागड्या रक्तचाचण्या करण्याचा सल्ला दिला जातो. या महागड्या चाचण्या आणि गरज नसतानाही रुग्णालयात भरती केल्याने, कुटुंबांवरील आर्थिक बोजा वाढत असल्याची खंतही या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या