शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

CoronaVirus News: कोरोनाची दुसरी लाट कधी ओसरणार?, परिस्थिती नियंत्रणात कधी येणार? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 08:10 IST

CoronaVirus News: देशात गेल्या १३ दिवसांत १४ लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद; काल देशात पहिल्यांदा आढळले तब्बल २ लाख कोरोना रुग्ण

नवी दिल्ली: गेल्या महिनाभरापासून देशातील कोरोना रुग्णांच्या आकडा झपाट्यानं वाढत आहे. ५ एप्रिलला देशात पहिल्यांदा दिवसभरात १ लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यानंतर पुढील १० दिवसांत हा आकडा २ लाखांच्या पुढे गेला. त्यामुळे सगळ्यांचीच चिंता वाढली आहे. कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिक भीषण ठरत आहे. ही लाट नेमकी कधी ओसरणार आणि परिस्थिती कधी पूर्ववत होणार, असे प्रश्न संपूर्ण देशाला पडले आहेत. आयआयटी कानपूरमधील एका टीमनं गणिती मॉडेलच्या माध्यमातून कोरोना रुग्णसंख्या आणि रुग्णवाढीचा अभ्यास करून यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. (CoronaVirus News second corona wave might reach its peak between 20 to 25th april predicts iit kanpur team)पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये देता येऊ शकते वेगवेगळी कोरोनाची लस? तज्ज्ञ सांगतात की....देशातील कोरोनाची दुसरी लाट २० ते २५ एप्रिल दरम्यान शिखरावर असेल, अशी माहिती आयआयटी कानपूरच्या टीमनं दिली आहे. आयआयटी कानपूरचे प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल यांनी दुसऱ्या लाटेबद्दल काही महत्त्वाचे अंदाज वर्तवले आहेत. 'दिवसाला दोन लाख कोरोना रुग्ण हे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं शिखर असेल, असा आमचा अंदाज होता. २० ते २५ एप्रिल दरम्यान देशात दिवसाला २ लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद होईल, असा आमचा होरा होता,' असं अग्रवाल म्हणाले.मास्क लावूनही होऊ शकतो कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा संसर्ग; जर तुम्हीही करत असाल याच चुकाकोरोनाच्या लाटेचं शिखर नेमकं कधी येईल याचा अंदाज कसा बांधला जातो, या प्रश्नालादेखील अग्रवाल यांनी उत्तर दिलं. कोरोनाच्या काही विशेष गोष्टींचा अभ्यास करून हा अंदाज वर्तवला जातो. यामध्ये दररोज होणारा कोरोनाचा फैलाव, लक्षणं नसलेल्या रुग्णांची संख्या आणि देशाच्या विविध भागांमध्ये घालण्यात आलेले निर्बंध या प्रमुख बाबींचा समावेश असतो, असं अग्रवाल यांनी सांगितलं.''मे महिन्यात स्थिती चांगली असेल''२५ एप्रिलनंतर देशातील ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागेल, असा दिलासादायक अंदाज अग्रवाल यांनी वर्तवला. मे महिन्याच्या अखेरपर्यंत परिस्थितीत सुधारणा झालेली असेल. प्रत्येक राज्यात कोरोना लाटेचं शिखर वेगवेगळ्या कालावधीत येईल का, यावर २० ते २५ एप्रिल या कालावधीत मोठ्या राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट शिखर गाठेल, असं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी आलेली कोरोनाची लाट आणि आता आलेली कोरोनाची दुसरी लाट यात एक प्रमुख फरक आहे. आता कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे. प्रादुर्भाव जास्त आहे. पण त्या तुलनेत मृतांचा आकडा कमी आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला देशातील कोरोना रुग्णांचा आकडा खाली आला होता. लस उपलब्ध झाल्यानं लोक निर्धास्त झाले. त्यामुळेच कोरोनाचा फैलाव वाढला, असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या