शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
3
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
4
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
5
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
6
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
7
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
8
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
9
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
10
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
11
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
12
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
13
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
14
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
15
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
16
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
17
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
18
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
19
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
20
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर

CoronaVirus News: चिंताजनक! लक्षणीय लोकसंख्या कोरोनाच्या विळख्यात; आरोग्य मंत्रालयानं सांगितला धोका

By कुणाल गवाणकर | Updated: September 29, 2020 20:40 IST

देशाला असलेला कोरोनाचा वाढता धोका कायम; आरोग्य मंत्रालय आणि आयसीएंमआरची माहिती

नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव देशात कायम असून अद्यापही धोका टळलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता कोरोनाची लाट ओसरत असल्याचं दिसून येत होतं. मात्र आरोग्य मंत्रालयानं देशातल्या जनतेला सतर्कतेचा इशारा दिला आहे. याआधी आरोग्य क्षेत्राशी संबंधित संघटना, जागतिक तज्ज्ञांनीदेखील धोका कायम असल्याचा इशारा दिला होता.देशातील मोठी लोकसंख्या अजूनही कोरोनाच्या विळख्यात असल्याचं आरोग्य मंत्रालय आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (आयसीएमआर) आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितलं. यासाठी आरोग्य मंत्रालयानं सीरो सर्व्हेचा आधार घेतला. कोरोनाचा धोका अजूनही कायम असल्यानं सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याचं, वारंवार हात धुण्याचं आणि मास्क वापरण्याचं आवाहन मंत्रालयाकडून करण्यात आलं.यावेळी आरोग्य मंत्रालयानं काही आकडेवारी सांगितली. 'देशात आतापर्यंत ५१ लाखांपेक्षा अधिक लोकांनी कोरोनावर मात केली आहे. हा आकडा जगात सर्वाधिक आहे. कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण ८३ टक्के इतकं आहे. कोरोना रुग्ण लवकर आढळून यावेत आणि त्यांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. दर १० लाख नागरिकांमागे ५२ हजार कोरोना चाचण्या केल्या जात आहेत,' अशी माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली.देशात आतापर्यंत ६१ लाख ६५ हजार २९१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातल्या ५१ लाख १ हजार जणांनी कोरोनावर मात केली. तर ९६ हजार ३१८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या ओडिशामध्ये कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढलं असून आसाममधील रुग्ण वाढीचा वेग किंचित कमी झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या