शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

CoronaVirus News: तेलंगणात कोरोनाचा सामूहिक संसर्ग सुरू; अधिक दक्ष राहण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 23:37 IST

तेलंगणामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या ५० हजारांवर गेली असून ४३८ लोकांचा बळी गेला आहे

हैदराबाद : तेलंगणामध्ये कोरोना विषाणूचा सामूहिक संसर्ग सुरू झाला असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. नागरिकांनी चार ते सहा आठवडे अधिक दक्षता बाळगावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

आरोग्य खात्याने म्हटले आहे की, तेलंगणामध्ये कोरोनाचा सामूहिक संसर्ग सुरू झाल्याची चिन्हे दिसत आहेत. संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या कित्येक पटीने वाढू शकते. कोरोना साथीचा फैलाव रोखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न राज्य सरकार करत आहे. या प्रयत्नांना लोकांनीही साथ द्यायला हवी.

तेलंगणामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या ५० हजारांवर गेली असून ४३८ लोकांचा बळी गेला आहे. २०१८-१९ या वर्षीच्या वैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी शासकीय रुग्णालयात एक वर्ष सेवा बजावणे आहे. संसर्गाचे प्रमाण आणखी वाढत असून ही स्थिती चिंताजनक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

विद्यार्थ्यांनाही बाधा

तेलंगणाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. के. रमेश रेड्डी यांनी सर्व वैद्यकीय महाविद्यालयांसाठी जारी केलेल्या आदेशात म्हटले की, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी शासकीय रुग्णालयांमध्ये एक वर्ष सेवा बजाविण्यासाठी तत्काळ संपर्क साधावा. त्यासाठी प्राचार्यांनी तशा सूचना या विद्यार्थ्यांना द्याव्यात. कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी डॉक्टरांचे संख्याबळ तोकडे पडू नये म्हणून हा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTelanganaतेलंगणा