शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

CoronaVirus News : आरोपीला अटक केल्यानंतर लगेचच त्याला आंघोळ करायला लावा..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 06:38 IST

CoronaVirus News : या संसर्गाचा पोलीस दलात आणखी फैैलाव होऊ नये म्हणून बंगळुरू पोलीस आयुक्तांनी आपल्या सहकाऱ्यांना काही आदेश दिले आहेत.

बंगळूरू : एखाद्या संशयिताला किंवा आरोपीला अटक केल्यानंतर त्याला लगेचच आंघोळ करायला लावा, असा आदेश बंगळुरू शहराचे पोलीस आयुक्त भास्कर राव यांनी पोलिसांना दिला आहे. बंगळुरू पोलिसांमध्ये कोरोनाचा संसर्ग आणखी वाढू नये म्हणून ही खबरदारी घेण्यात येत आहे.बंगळुरू पोलीस दलात १६ हजार जण असून, गेल्या काही आठवड्यांत ३८ पोलिसांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. गेल्या चार दिवसांत दोन पोलिसांचा या आजाराने मृत्यू झाला असून, अन्य ३५० पोलीस कर्मचारी क्वारंटाइनमध्ये आहेत. या संसर्गाचा पोलीस दलात आणखी फैैलाव होऊ नये म्हणून बंगळुरू पोलीस आयुक्तांनी आपल्या सहकाऱ्यांना काही आदेश दिले आहेत.त्यांनी म्हटले आहे की, संशयिताला किंवा अट्टल गुन्हेगाराला अटक केल्यानंतर त्याला सर्वप्रथम आंघोळ करायला लावा. हे सर्वच प्रकरणांमध्ये शक्य होईल असे नाही. पण जेव्हा शक्य असेल तेव्हा या सूचनेचे पोलिसांनी पालन करावे. जर एखाद्या आरोपीला घरात अटक केली, तर त्याला तिथे आंघोळ करायला सांगा किंवा या आरोपीला घेऊन जवळच्या सार्वजनिक प्रसाधनगृहात जावे. आंघोळीनंतर त्याने कपडे बदलले आहेत की नाही याचीही खात्री करून घ्यावी.या आरोपीचे व्यवस्थित सॅनिटायझेशन झाल्यानंतरच त्याला पोलीस ठाण्यात घेऊन जावे. आरोपीची तातडीने कोरोना चाचणी करून घ्यावी. चाचणीचा अहवाल येत नाही तोवर या आरोपीशी फिजिकल डिस्टन्सिंग राखावे. आरोपीच्या निकट संपर्कात येणाºया पोलिसांनीही स्वत:चे सॅनिटायझेशन करून घ्यावे.>आरोग्य सुरक्षेसाठी घ्या दक्षताबंगळुरू शहराचे पोलीस आयुक्त भास्कर राव यांनी म्हटले आहे की, कोरोना साथीमुळे सध्या अतिशय बिकट स्थिती निर्माण झाली असून त्यातही आपल्याला नीट काम करायचे आहे. त्यासाठी आरोग्य सुरक्षेकरिता पुरेपूर दक्षता बाळगायची आहे. छोटे-मोठे गुन्हे करणारे अनेक आरोपी हे कोरोना संसर्गाने ग्रस्त आहेत. त्यांच्यामुळे पोलिसांना या आजाराची लागण होते. तो संसर्ग रोखायला हवा. पदरायनपुरा भागात हिंसाचार केल्याच्या आरोपाखाली अटक केलेले चार गुन्हेगार कोरोनाग्रस्त होते. त्यामुळे सुमारे ४० पोलिसांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्याची वेळ आली होती. अशी आणखी काही उदाहरणे बंगळुरू शहरात घडली आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या