शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

CoronaVirus News : एकाच चितेवर 5 मृतदेहांवर अंत्यसंस्कार; गुजरातमध्ये कोरोनामुळे मरण पावलेल्यांची प्रत्यक्ष संख्या जास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 06:49 IST

CoronaVirus News : स्मशानभूमीत २४ तास अंत्यसंस्कार सुरू आहेत, तरीही मृतदेहांची संख्या कमी होत नाही. बहुतांश मृत्यू हे कोरोनाबाधेमुळे होत आहेत.

अहमदाबाद : सुरत शहरात एका स्मशानभूमीत बुधवारी रात्री एका चितेवर पाच मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले गेले. याचा उद्देश असा होता की, अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा करीत असलेल्या मृतदेहांची संख्या कमी व्हावी. ही परिस्थिती फक्त सूरतमधील नाही तर संपूर्ण गुजरातमध्ये स्मशानभूमीतील आहे. स्मशानभूमीत २४ तास अंत्यसंस्कार सुरू आहेत, तरीही मृतदेहांची संख्या कमी होत नाही. बहुतांश मृत्यू हे कोरोनाबाधेमुळे होत आहेत. कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर स्मशानभूमीत पोहोचत असलेल्या मृतदेहांची संख्या आणि सरकारी आकडेवारी यांच्यात जमीन-आकाशाचे अंतर आहे. सूरत, वडोदरा, अहमदाबाद आणि राजकोट महानगरपालिकेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनातील संख्या पाहिली तर रोज २५ मृत्यू होत असल्याचा दावा केला जात आहे. प्रत्यक्षात मृत्यू किती तरी जास्त आहेत.

७ ते १५ एप्रिल दरम्यान ९० मृत्यूमध्य गुजरातमधील वडोदरातील सगळ्यात मोठ्या एसएसजी रुग्णालयात गेल्या नऊ दिवसांत कोविड आयसीयूमध्ये कमीतकमी १८० जणांचा मृत्यू झाला. भडोचमध्ये आठ दिवसांत २६० कोविड-१९ रुग्णांचा मृत्यू झाला. सरकार फक्त ३६ मृत्यूच झाल्याचे म्हणते. वडोदरातील जीएमईआरएस वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे आकडे पाहिले तर कोविड आयसीयूत सात ते १५ एप्रिल दरम्यान ९० मृत्यू झाले. प्रत्यक्षात चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर आयसीयूत रोज किमान १५ जणांचा मृत्यू होत आहे.एका आठवड्यात रोज किमान ५० कोरोना रुग्णांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले जात आहेत. दोन दिवसांत ही संख्या १०० झाली. राजकोट जिल्ह्यात आठ ते १४ एप्रिल दरम्यान कोविड रुग्णालयात २९८ पेक्षा जास्त मृत्यू झाले तरी सरकारी दप्तरात फक्त ५७ मृत्यूंची नोंद आहे. गुरुवारी राजकोटमध्ये इतर ८२ जणांचा मृत्यू झाला. सूरतमध्ये दोन मोठ्या स्मशानभूमीत पाच ते १३ एप्रिल दरम्यान रोज जवळपास ८० दाह संस्कार झाले. येथे तीन नव्या स्मशानभूमी सुरू केल्या गेल्या. नवनिर्मित पाल स्मशानभूमीत रोज किमान २०-२० अंत्यसंस्कार केले जात आहेत.

१० स्मशानभूमीत १०० अंत्यसंस्कार

वडोदरातील या दोन सरकारी रुग्णालयांत एका आठवड्यात ३५० जणांचा मृत्यू झाला.  भडोचच्या स्मशानभूमीतील रजिस्टरमध्ये एका आठवड्यात कोरोनामुळे मरण पावलेल्या २६० जणांचे अंत्यसंस्कार केले गेले. जिल्ह्यात अधिकृत नोंद ही ३६ मृत्यूंची आहे. नर्मदा नदीच्या काठावर दाह संस्कार करणारे धर्मेश सोळंकी म्हणाले की, गेल्या एक आठवड्यापासून रोज २२-२५ कोरोनामुळे मरण पावलेल्यांचे दाह संस्कार होत आहेत. रोज जवळपास साडेसात हजार किलोग्रॅम लाकडाचा पुरवठा होत आहे. अहमदाबादेत गेल्या चार दिवसांत दहा स्मशानभूमीत जवळपास १०० मृतदेहांवर दाह संस्कार झाला आहे. 

टॅग्स :Gujaratगुजरातcorona virusकोरोना वायरस बातम्या