शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

CoronaVirus News: दिल्ली, मुंबईच्या तुलनेत अहमदाबाद जीवघेणे; बनावट व्हेंटिलेट, गुजरात मॉडेलवर प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2020 06:31 IST

मुंबईच्या तुलनेत दुप्पट लोकांनी जीव गमावला

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या उद्रेकामध्ये मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णांना व्हेंटिलेटरच्या नावाखाली आर्टिफिशिअल मॅन्युअल ब्रिथिंग युनिट (एएमबीयू) लावण्यात येऊन लोकांच्या जिवाशी खेळ करण्यात आला. हा मुद्दा आता चांगलाच तापत असून, त्यामुळे गुजरात मॉडेलवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

गुजरातचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमत चावडा यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या गुजरात मॉडेलला विकासाचे अग्रणी म्हणून सांगत होते, त्याचे पितळ उघडे पडण्यास सुरुवात झाली आहे. त्याचे वास्तव म्हणजे पैसे कमावण्यासाठी लोकांच्या जिवाशी खेळताना त्यांना काहीही वाटत नाही. त्यांचे म्हणणे आहे की, धामन-१ मशीनच्या वापरामुळे गुजरातमध्ये कोरोनाच्या मृतांची संख्या वाढली.काँग्रेसने आता या बनावट मशीनचा पर्दाफाश करण्यासाठी गुजरात मॉडेलचे एकेक पदर उलगडून दाखविण्यास सुरुवात केली आहे.

काँग्रेसचे गुजरातमधील नेते व माजी खासदार राजू परमार म्हणाले की, गुजरातमधील कोरोनामुळे होणाºया मृतांची वास्तविक संख्या रूपानी सरकार हे केंद्राच्या इशाºयावरून जाहीर होऊ देत नाही. एवढेच नव्हे, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या इशाºयावर एम्सचे संचालक गुलेरिया येथे येतात व राज्य प्रशासन रुग्णांची तब्येत योग्य असल्याचे सांगून सुटी देते. हे केवळ संख्या कमी दाखविण्यासाठी चालले आहे. सत्य लपवा, हेच खरे गुजरात मॉडेल आहे.

काँग्रेसने आज राष्ट्रीय स्तरावर हा मुद्दा उपस्थित करून भाजप सरकारवर थेट हल्लाबोल केला. व्हेंटिलेटरच्या नावाखाली एएमबीयू मशीन का खरेदी केल्या, असा सवाल पक्ष प्रवक्ते पवन खेडा यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, केंद्र सरकारची कंपनी एच.एच.एल. लाईफ केअरने विनातपासणी व विनाचाचणी ५ हजार मशीनची कशी आॅर्डर दिली? गुजरात सरकारचे आकडे सांगतात की, २५ व १८ मार्च रोजी सार्वजनिक रुग्णालयातून ३३८ रुग्ण बरे होतात व ३४३ जणांचा मृत्यू होतो. व्हेंटिलेटरच्या जागी या लोकांना एएमबीयू मशीन लावल्याचा हा परिणाम होता.

आता काँग्रेसचा सवाल आहे की, मुख्यमंत्री रूपानी व पराक्रमसिंह जडेजा यांच्यात काय संबंध आहेत? सरकार व त्यांचे अधिकारी ज्योती सीएनसी कंपनीचा बचाव का करीत आहेत? याच कंपनीने एएमबीयू मशीनचा पुरवठा केला होता.

नवी दिल्ली : कोरोना संसर्गाच्या बाबतीत आर्थिक घडामोडींचे शहर मुंबई आणि राजकीय राजधानी दिल्लीत सर्वाधिक रुग्ण असतील मात्र, तरीही अहमदाबादमध्ये कोरोना अधिक जीवघेणा ठरला आहे. या दोन्ही महानगरांच्या तुलनेत कमी रुग्ण असूनही अहमदाबादेत अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबादेत मुंबईच्या तुलनेत दुप्पट तर, दिल्लीच्या तुलनेत जवळपास तिप्पट लोकांनी आपला जीव गमावला आहे.

याचे उत्तर दिलेच पाहिजे

अहमदाबाद सार्वजनिक रुग्णालयाच्या अधीक्षकांनी बजावून सांगितले होते की, या मशीन रुग्णांसाठी योग्य नाहीत. त्यांना व्हेंटिलेटर पाहिजेत; परंतु गुजरात मॉडेलच्या तंत्राने एएमबीयू मशीनचा वापर करण्यास सांगण्यात आले. आता हा मुद्दा खूपच तापला असून, एफआयआर दाखल करण्याचे सत्र सुरू झाले आहे. काँग्रेसने सवाल केला आहे की, विरानी परिवार व मोदी यांच्यात काय संबंध आहेत? ज्या कंपनीने बनावट व्हेंटिलेटरचा पुरवठा केला, त्या कंपनीचे शेअर होल्डर रमेश भाई विरानी आहेत का, असा सवालही काँग्रेसने केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGujaratगुजरातMumbaiमुंबईdelhiदिल्ली