शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

CoronaVirus News : देशात २८,७०१ नवे रुग्ण; ५ लाख ५३ हजार ४७० झाले पूर्ण बरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 06:43 IST

गेल्या चोवीस तासांत आणखी ५०० जण या आजाराने मरण पावल्याने एकूण बळींची संख्या २३,१७४ झाली आहे.

नवी दिल्ली : देशात एकाच दिवसात कोरोनाचे २८,७०१ नवे रुग्ण आढळून आले असून ही विक्रमी वाढ आहे. त्यामुळे कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ८ लाख ७८ हजारांवर पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासांत आणखी ५०० जण या आजाराने मरण पावल्याने एकूण बळींची संख्या २३,१७४ झाली आहे.६३.०१ रुग्ण बरे झालेकोरोनाच्या आजारातून उपचारानंतर पूर्णपणे बरे झालेल्यांची संख्या ५,५३,४७० इतकी झाली आहे. तर ३,०१,६०९ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६३.०१ टक्के आहे.

लॉकडाऊनमध्ये वाढदेशात कोरोनाचे २६ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. तेरा दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत तीन लाखांनी वाढ झाली. कोरोनाच्या फैलाव कमी करण्यासाठी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आसाम आदी राज्यांनी लॉकडाऊनची मुदत वाढविली आहे.इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, १२ जुलै रोजी देशभरात कोरोनाच्या 219103 चाचण्या पार पडल्या. त्यामुळे या दिवसापर्यंत राष्ट्रीय स्तरावर कोरोनाच्या चाचण्यांची एकूण संख्या १,१८,०६,२५६ झाली आहे.दिलासा : मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर ७० टक्के !मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ७० टक्क्यांवर पोहोचला आहे. तर ५ ते १२ जुलैपर्यंत कोविड वाढीचा दर १.३६ टक्क्यांवर पोहोचला आहे. रुग्ण दुपटीचा दर ५१ दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत दिवसभरात १ हजार १५८ कोरोनाबाधित रुग्ण तर ४७ मृत्यूंची नोंद झाली. मुंबईत कोरोनाबाधितांची एकूण संख्या ९४,१४६ झाली असून मृतांचा आकडा ५,३३५ झाला आहे. आतापर्यंत शहर, उपनगरातील ६५,६२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.राज्यात दिवसभरात ६,४९७ नवे कोरोना रुग्णमुंबई : राज्यात सोमवारी दिवसभरात ६ हजार ४९७ रुग्ण वाढले आणि १९३ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ६० हजार ९२४ झाली असून बळींचा आकडा १० हजार ४८२ झाला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३८ टक्के तर मृत्यूदर ४.०२ टक्के झाला आहे. राज्यात सोमवारी १९३ मृत्यूंची नोंद झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या