शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

Coronavirus: लॉकडाऊन काळात भारतीय रेल्वेचा नवा इतिहास; प्रवासी वाहतूक बंद करुनही झाला फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 17:03 IST

एका रेल्वेमधून सुमारे पाच हजार टन धान्यपुरवठा केला जात आहे

नवी दिल्ली – संपूर्ण देश सध्या कोरोना व्हायरस संकटाशी मुकाबला करत आहे. या संकटाला रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. ज्यामुळे देशात अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सगळं ठप्प आहे. अशा कठीण परिस्थितीत गरिबांना जेवणही उपलब्ध होत नाही. या लोकांसाठी सरकारकडून विविध  ठिकाणी कम्युनिटी किचन सुविधा सुरु केली आहे.

या संघर्षाच्या प्रसंगात रेल्वे देशभरात अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची महत्त्वाची भूमिका बजावत आहे. लॉकडाऊन काळात भारतीय रेल्वेने नवा इतिहास रचला आहे. रेल्वेकडून लोकांपर्यंत आवश्यक खाद्यपुरवठा केला जात आहे. पंजाबच्या ढंढारीकला येथून न्यू जलपाइगुडी इथंपर्यंत रेल्वेने दोन इंजिन आणि दोन अतिरिक्त डब्ब्यांसह ८८ डब्ब्यांची अन्नपूर्णा मालगाडीने ४९ तास ५० मिनिटात १ हजार ६३४ किमी प्रवास करण्याचा ऐतिहासिक विक्रम नोंद केला आहे. यापूर्वी हे अंतर कापण्यासाठी ९६ तास ते १०० तास लागत होते. पण प्रवासी वाहतूक बंद असल्याने मालगाड्यांसाठी रेल्वे वाहतूक क्लीअर मिळत आहे त्याचा लाभही घेतला जात आहे.

पण या मालगाडीने रेल्वेच्या इतिहासातील एक नवीन अध्याय लिहिला आहे. याच कारणास्तव रेल्वेने या गाडीला अन्नपूर्णा असं नाव दिले आहे. अन्नाने भरलेल्या अन्नपूर्णा ट्रेनने तातडीने देशातील दहा राज्यांमधील गरजू लोकांना अन्न पुरवले जात आहे. रेल्वेने प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्नधान्याची वाहतूक केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 137 टक्के जास्त आहे.

लॉकडाऊनच्या या टप्प्यात रेल्वेने भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय) सोबत १ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत अन्नधान्याची वाहतूक सुरु केली आणि त्यांचे उत्पन्नही वाढवले. रेल्वेचे सुमारे 70 टक्के उत्पन्न या वाहतुकीतून मिळत आहे. यामुळे रेल्वेला झालेल्या तोट्याची नुकसान भरपाईही काही प्रमाणात मिळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कोट्यवधी टन धान्य अनेक राज्यात पोहचवले गेले. जेणेकरून स्थानिक लोकांसह परप्रांतीय मजुरांनाही हे धान्य मिळू शकेल. रेल्वेच्या या प्रयत्नातून देशातील सुमारे ८० टक्के लोकांना फायदा होणार आहे.

एका रेल्वेमधून सुमारे पाच हजार टन धान्यपुरवठा केला जात आहे. उत्तर रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी १ ते १४ एप्रिल दरम्यान उत्तर प्रदेशात मागील वर्षी ०.३३ लाख टनांपेक्षा २.९७ लाख टन धान्य पुरवठा केला आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत ७९२ टक्क्यांनी अधिक आहे.  त्याचप्रमाणे बिहारमध्ये १.३० लाख टन ते २.२८ लाख टन (७६% वाढ), आसाममध्ये ०.५३ लाख टन ते २.०७ लाख टन(२९१% वाढ) महाराष्ट्रात ०.८० लाख टन ते १.८५ लाख टन (१३५% वाढ), गुजरातमध्ये ०.४७ लाख टन ते १.५५ लाख टन (२३०% वाढ), कर्नाटक ०.८० लाख टन ते १.५५ लाख टन (९३% वाढ) अशाप्रकारे अन्य राज्यात १.९४ लाख टन ते २.३९ लाख टन अन्य धान्याचा पुरवठा केला आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndian Railwayभारतीय रेल्वे